Tuesday, July 23, 2019

अभियांन्त्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग १. **** अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो ****

**** अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो ****
अभियांन्त्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग १.
आजची अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेतलेली मुले हि खरच आहेत. या अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेऊन अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी कुणी कुणी काय दिव्य केल असेल हे सांगितल तर आजच्या या पिढीला कळणार पण नाही कदाचित विश्वास पण वाटणार नाही .
कित्येकाच्या बापांनी जमिनी गहाण टाकल्या,विकल्या. कित्येक आयांनी आपले अंगावर एक मणी ठेउन उरलेलं सगळ सोन मोडून टाकल , कित्येक बहिणींनी आपल्या भावाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या शिक्षणाला मुरड घातली कधीकधी सासरचा मार खावून भावाच्या शिक्षणासाठी चोरून दागिने मोडले आणि त्याचबरोबर हे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्यानी पण ते शिक्षण घ्यायच्या साठी किती दिव्य केल असेल. कित्येकांनी दिवस रात्र मजुरी केली , कित्येकजण उपाशीपोटी , अर्धपोटी झोपली. यांच्या कथा सांगितल्या तरी त्यावर अफाट सिनेमे आणि कितीतरी मालिका होतील.
हे सगळ करत असताना त्यांचा एकच विश्वास होता कि केवळ हे शिक्षणच आपलं आयुष्य बदलणार आहे , हे शिक्षणच आपल्याला गरिबीतून बाहेर काढणार आहे , हे शिक्षणच आपल्याला मानसन्मान मिळवून देणार आहे. त्यामुळे या अभियांत्रिकी शिक्षणाला खूपच सन्मान होता. लोकांना त्त्याची किंमत होती. त्यामुळे हे शिक्षण घ्यायच्यासाठी खूपच ढोर मेहनत करायला लागते हे सर्वांनाच मान्य होत आणि ती मेहनत प्रत्येकजण घ्यायचा.
याउलट आजच चित्र . शिक्षण अगदी दारात आलंय , घरची परिस्थिती सुधारली आहे. मागितलेली वस्तूच नाव घ्या बाप लगेच आणून देतय, हे जेव्हा नजरेसमोर येत तेव्हा आजची हि पिढी खूपच भाग्यवान समजली पाहिजे. घराजवळच कॉलेज, कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच मिळालेली गाडी , हातात अँड्रोइड फोन आणि बरंच .काही पालक म्हणजे अल्लाउद्दीनचा जीन झाले आहेत.
मग आज या अभियांत्रिकी शिक्षणाचं का हसं होतय? याला कारण एकच आहे कि पालकाकडे पैसे आले पण विद्यार्थ्याकडे मेहनत, जिद्द ,स्वप्न आणि विश्वास हे नाही. त्याच्या मनात या शिक्षणाचे महत्व राहिलेलं नाही. या शिक्षणाविषयी आदर राहिलेला नाही. पालक कराव म्हणून पोराला इंजिनियर करायला लागले आहे आणि पोर पण बाप घालतय म्हणून अभियांत्रिकी शिक्षण करत आहे. अभियांत्रिकी शिक्षण का घेतोय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना काय शिकायचं ? त्या विषयाच महत्व काय या विषयी विद्यार्थी आणि त्यांचे पालक बेफिकीर आहेत. केवळ हेच कारण आहे अभियांत्रिकी शिक्षण तळाला जायचं.
अभियांत्रिकी शिक्षण हि एक गुंतवणूक आहे हेच लोकांना कळत नाही .या गुंतवणूकीची जोपासना कशी करायची याची जाणीव नाही. ज्यावेळी व्यावसायीकरण होत त्यावेळी गुणवत्ता वाढीस लागते पण ती केव्हा? जर ग्राहक जागरूक असेल तर अन्यथा नाही. आपल्याकडे तसच झाल आहे . जर हा ग्राहक जागरूक झाला तर अभियांत्रिकी शिक्षणाला परत महत्व नक्कीच येईल हा मला विश्वास आहे.
त्यामुळे हि लेखमाला हि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी नाही तर त्यांच्या पालकासाठी पण आहे. विद्यार्थी कुठल्याही महाविद्यालयात शिकत असु दे , आजकाल कुठलही अगदी गाव पातळीवरच जरी अभियांत्रिकी महाविद्यालय घेतलं तरी त्याच्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुरेपूर सोयी असतात पण त्या विद्यार्थांनी व्यवस्थितपणे कशा वापराव्या आणि चार वर्षात कस वागावं , राहावं कस शिकाव या बद्दल या लेखमालिकेतून मार्गदर्शन केल जाईल . कधी मी कठोर शब्द वापरले आणि कुणाला राग आला तर केवळ मी हे अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रेमापोटी लिहित आहे हे समजून घ्या.
अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो हि प्रार्थना.
कृपया शेअर करा ......
धन्यवाद .
या पूर्वीची लेखमाला वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन .
९७६३७१४८६
www.dolphinlabs.in