Saturday, October 24, 2015

इलेक्ट्रोनिक्स आणि मानसशास्त्र

कोणत्याही बदलाला सामोरे जाताना माणसाच मन हे चार स्थिती मधुन जात असत. विरोध (oppose) , राग (anger), वाटाघाट (negotiation) आणि  स्वीकार (accept).
आपण शिक्षक आहोत म्हणुन आपल्या पेशासंबंधी उदाहरण घेऊ.
समजा एक शिक्षक  विद्यार्थ्यांना सांगतात कि रविवारी सकाळी जादा तास घ्यायचा आहे सर्वांनी आठ वाजता या. सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडतात.नको. कारण कोणत्याही बदलाला विरोध करणे हा माणसाचा स्वभाव आहे. किबहुना विरोध करणे हे माणसाच्या रक्तातच  आहे. कारण या गुणधर्मामूळेच तर माणसाच्या रक्तात विषाणु घुसल्याबरोबर प्रतिकारशक्ती त्या विषाणुना  विरोध करते.
मग शिक्षक परत एकदा म्हणत यायलाच पाहिजे.  मग विद्यार्थी मनाच्या दुसऱ्या स्थितीत जातात .ते चिडतात मग मनातल्या मनात शिव्या घालतात. या शिक्षकांना काही काम नाही.....,फालतू मध्ये सेम वाया घालवतात आणि शेवटी जादा तास घेतात.......,वगैरे,वगैरे...मग विद्यार्थी तिसऱ्या स्थिती मध्ये जातात. ते म्हनु लागतात. सार मग अस करू या का? आठ ऐवजी नऊला येवूया का ? अथवा तीन तासाऐवजी दोन तास घ्या  
............अशा प्रकारे वाटाघाटी सुरु होतात . आणि शेवटी वेळ ठरते आणि सारे येतात.

आता याचा इलेक्ट्रोनिक्सशी संबध कसा? मित्रानो यासाठी आपण लक्षात घेउया सेरीज रेसोनंस सर्किट. या सर्किट मध्ये रेझिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे सेरीज मध्ये जोडलेले असतात. आता याठिकाणी आपण सोअर्स म्हणजे शिक्षकांची रविवारी येण्याची कल्पना. लगेच यामधील रेझिस्टर हा विरोध करतो. परत एकदा शिक्षक म्हणतात यायला पाहिजे.त्यावेळी कॅपॅसिटरच्या मुळे टोकाची भूमिका घेतली जाते म्हणजेच राग येतो तोपर्यंत कॅपॅसिटर हा चार्ज व्हायला लागतो. शिक्षक म्हणतात यायलाच पाहिजे,यायलाच पाहिजे म्हणजेच ते वारंवार सांगु लागतात  त्याबरोबर कॅपॅसिटर आणि इंडक्टर  मध्ये आंदोलन व्हयला लागत म्हणजेच वाटाघाटी सुरु होतात .शेवटी XL=XC होतो आणि काय हि कटकट आहे असा थोडासा विरोध मनात ठेवून शेवटी मुले रविवारी सकाळी क्लासला येतात. 




No comments:

Post a Comment