Thursday, May 9, 2024

****** भारतीय परंपरा , मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ********

 *

१ .....
खुप वर्षापूर्वी म्हणजे १९८३ साली वाचलेली गोष्ट आहे . त्यावेळी मी तिसरीत होतो . रामकृष्ण मिशनच्या कुठल्यातरी एक पॉकेट बुकमध्ये लिहिलेली होती . त्यावेळी मला या गोष्टीचा अर्थ एव्हढा खोल मध्ये समजला नव्हता पण आज त्या एका गोष्टीत वरील विषयाला समजून घेण्याचा परिपूर्ण संदर्भ आहे .
गोष्ट तशी लहानच आहे . त्यावेळच्या परिस्थितीला ती परिपूर्ण होती पण आजच्या विषयासाठी मी त्यात थोडीशी भर घालेन.
एका गावातील एक मुलगा लहान वयातच घर सोडून तप :श्चर्या करण्यासाठी जंगलात जातो तो बारा वर्षांनी साधू बनून घरी येतो. सगळे लोक त्याचा सन्मान करतात . त्याचा मोठा भाऊ त्याला विचारतो या तपश्चर्या केल्याचे फळ काय ? मग तो साधू भावाला घेऊन नदीकिनारी जातो. आणि नदीच्या पाण्यावरून या तीरावरून चालत पलीकडच्या तीराला जातो आणि परत येतो . साधूला वाटते कि भाऊ कौतुक करील. पण भाउ म्हणतो काय बारा वर्ष तपस्चर्या करून हे इतकंच मिळवलास ? यात कौतुकाच काय आहे? दोन आणे दिले तर नावाडी मला या तीरावरून तिकडे आणि परत मला घेऊन येतो . तू ज्ञानाच्या सागरात तर उतरलास पण मोती आणायच्या ऐवजी गोटे आणलेस . साधूला चूक कळली आणि परत तो जंगलाच्या दिशेने चालू लागला .
तर हि गोष्ट इथेच संपली पण मी थोडा शेवट बदलतो .
ज्यावेळी भाउ साधूला फटकारतो तेव्हा साधू म्हणतो . अरे दादा हे कलियुग आहे . इथे नमस्कार हा चमत्काराला होतो . मी पाण्यावरून चालून जायच्या कार्यक्रमाच आयोजन करेन आणि भक्त मंडळी वाढवून एक वेगळा पंथ निर्माण करेन , मोठमोठे मठ बांधेन आणि बरंच काही करता येईल . अस त्यान थोडस भावाला समजावून सांगितले आणि त्या बरोबर भावाने लगेच त्याचे पट्ट शिष्यत्व स्वीकारले.
२ .....
सुमारे पाच वर्षापासून मी एक व्हिडीओ पाहतोय . अधून मधून तो व्हाटस अप वर मला दिसतो .तुम्ही पण पाहीला असेल आणि शेअर पण केला असेल .
तर ‘गरुड संजीवनी’ नावाची एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ती फक्त भारतात आढळते आणि काही दाव्यानुसार ती हजारो वर्षापासून आपल्याकडच्या लोकांना माहित आहे . त्या वनस्पतीची जर काडी पाण्यात टाकली तर ती प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहात जाते . जर नळ चालू केला तर त्याच्या धारेमध्ये सुद्धा ती वरच्या दिशेने जाते . मला वाटते कि ज्याच्या फोनवर whats app, फेसबुक , इन्स्टाग्राम आहे त्या सर्वांनी तो पाहिला असेलच . हा व्ही डी ओ पाहणाऱ्यामध्ये भारतातील मोठमोठे नामांकित असतील .
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडील एकालाही वाटलं नाही कि या वनस्पतीचा अभ्यास करावा . जर हा व्हिडिओ खरा असेल तर जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त पी एच डी चे टॉपीक यातूनच मिळतील . या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचे असे काय वैशिष्ठ्य आहे कि ज्यामुळे हि काडी प्रवाहाच्या विरुध्द आहे हे जर कळले तर बऱ्याच गोष्टीमध्ये क्रांती होईल. पण आमच्याकडे या दृष्टीने कधीच पाहिले जात नाही उलट हा चमत्कार मानून ती वस्तू देव्हाऱ्यात ठेवली तर अमुक अमुक लाभ होईल अशा भाकड कथन करून तीची पूजा तर केली जाईल किंवा भरमसाठ पैशात ती विकली जाईल .
आमच्याकडे चमत्काराचा कधी अभ्यास केला जात नाही उलट त्याला प्रश्न केला कि त्याला धर्मविरोधी म्हणणे आणि बहिष्कृत करणे हेच केलं जात . अध्यात्माचा अभ्यास विज्ञानाच्या चश्मातून कधी केलाच जात नाही . उद्या कदाचित पाश्चात्य संशोधकांनी या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचा अभ्यास करून जर एखादे प्रोडक्ट बनवले तर लोक लगेच एखाद्या पुस्तकाचा आधार देवून गळे काढून हे तंत्रज्ञान भारतातच कस बनलं होत हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतील.
आपल्याकडे हाच मोठा प्रश्न आहे . भास्कराचार्य , जीवक, कणाद, वराहमिहिर , सुश्रुत हे मधल्या काळात कुठे गडप झाले होते. असे कितीतरी लोक आपल्याकडे काळाच्या ओघात गडप झाले.
हळदी मध्ये निरमा पावडर मिसळून हळदीचे कुंकू बनवून दाखवून रोज काही हजारात कमावणारे बुवा अगदी गेल्या दशकापर्यंत होते .
लोकांना सांगण्यासाठी शास्त्र झाली पण शास्त्रज्ञ अस्तंगत झाले. आजच्या काळात तर परिस्थिती खूपच वाईट आहे . लोकांचा प्रवास परत उलटा होत आहे . शास्त्राचा अभ्यास करून सृष्टीचे गूढ सोडवण्या ऐवजी परत चमत्कार आणि बुवाबाजीला उत येत चालला आहे.
आमच्याकडे देशाची सेवा करणारे शास्त्रज्ञ याच्यापेक्षा साधू आणि बुवा जास्त कमावतात . परवा चंद्रावर यान उतरवल त्या इस्त्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञाच्या टीमच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आणि मानसन्मान आपल्याकडचे काही बुवा किंवा महाराज एका दिवसात कमवत असतील.
भारतीय परंपरेत खुप चांगल्या गोष्टी असतील पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास होत नाही . चमत्कार आणि कर्मकांड यात या गोष्टीच अवडंबर माजवल जात आहे . याला कारण आमच्याकडे नमस्कार हा चमत्काराला मिळतो . त्या चमत्काराच्या मागचे शास्त्र समजून घेउन त्यावर संशोधन करून सध्याच्या काळाला अनुरूप अशा गोष्टी स्वीकारायाची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही.
आणि इथून पुढ स्वीकारतील अस वाटत नाही ... सध्यातरी एक गोष्ट घडत आहे आपण झपाट्याने उलट्या दिशेने चाललो आहोत. बघू पुढ काय होतंय ते .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स
९७६३७१४८६०
See insights
Boost a post
All reactions:
Mahesh Waghmare, Dr-Tejashri Mohite Patil and 7 others

^^^^^^नवीन शिक्षण पद्धती – अमुलाग्र बदलाची गरज ^^^^^^


आज काल नवीन शिक्षण पद्धतीवर सगळीकडे विचार मंथन सुरु आहे . अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राने तर हे खूपच मनावर घेतले आहे . बरेच महान वक्ते आणि अभ्यासक यावर विचार मांडत आहेत त्यामुळे माझं लिहीन म्हणजे सूर्यासमोर पणतीचा प्रकाश. पण याचा अर्थ विचार मांडूच नये असा नाही त्यामुळे हे लिहित आहे .
नवीन शिक्षण पध्दती मध्ये बरंच सगळ नवीन आणलं आहे . चांगली गोष्ट आहे. बदल हा घडलाच पाहिजे पण आपल्याकडे बदल हा गांभीर्याने घेतला जात नाही . आपल्याकडे बदल म्हणजे जुन्या बाटलीला नवीन लेबल लावलं म्हणजे झाल . नवीन शिक्षण पद्धतीत आता आता हे बदलायची गरज आहे .आता इथं केवळ बाटलीच नव्हे तर बाटलीच्या आतील पदार्थ सगळंच बदलायची गरज आहे . केवळ हे पदार्थच नाही तर ते पदार्थाचे डोस द्यायची पद्धत सुद्धा बदलायची गरज आहे . या अनुषंगाने विचार केला तर हे करत असतांना महाविद्यालय , स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठे (याठिकाणी विद्यापीठ म्हणजे स्वायत्त विद्यापीठ ज्याला इतर महाविद्यालये जोडलेली नाहीत असा आहे ). यामध्ये द्यायच्या शिक्षण पद्धती मध्ये आमुलाग्र बदल केला पाहिजे . कारण यांचे प्रत्येकाचे उद्देश हे वेगवेगळे आहेत आणि यातील सीमारेषा अगदी धूसर आहे . तसा हा विषय खूपच मोठा आहे त्यामुळे हळूहळू बदल कुठे झाले पाहिजेत यावर जमेल तस लिहित जाईन .
बदल करत असताना सध्याचा जो एक तास एक विषय हा असा एका दिवसात चार विषय थेअरी आणि एक प्रॅक्टिकल ढाचा हा मोडला पाहिजे . किमान विद्यापीठ पातळीवर तर झाला पाहिजे . थेअरी आणि प्रॅक्टिकल हे आता वेगवेगळ घ्यायची पद्धत पण आता मोडीत काढली पाहिजे . मुळात विषयांची जी अनावश्यक संख्या वाढवली आहे ती कमी केली पाहिजे आणि तास पद्धती ऐवजी सुरवातीला आठवड्यातून तीन तीन दिवस एक विषय असे दोन विषय एका आठवड्यात शिकवणे असे स्वरूप ठेवले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात प्रात्याक्षिके झाली पाहिजे . विद्यार्थ्याला विषयाची ओळखच हि प्रात्यक्षिकातून झाली पाहिजे मग त्या विषयाची मांडणी हळूहळू विषय जाणून घेणे आणि नंतर त्या विषयाची खोली वाढवत नेणे असा प्रवास झाला पाहिजे . म्हणजेच सेमिस्टरच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यात एक विषय तीन दिवस असे स्वरूप पाहिजे . नंतरच्या महिन्यात एक विषय एक दिवस आणि तिसऱ्या महिन्यात मग एक तास एक विषय अस स्वरूप झाल पाहिजे .
सुरुवातीला विचार केला तर हे अवघड वाटेल पण जर शांतपणे विचार केला तर हे एकदम सोप आहे .उलट या पद्धतीत बऱ्याच गोष्टीची कटकट कमी होईल.
आता या प्रकारे विषय शिकवण्यासाठी विषय शिकवण्याच्या पद्धती मध्ये पण बदल करायला लागेल . अभ्यासक्रमाचा ढाचा हा पूर्णपणे बदलावा लागेल. विषय हे प्रात्यक्षिकच्या रुपात मांडले जातील त्यामुळे विध्यार्थाना पण विषय चांगले समजतील.
सध्याचा अभ्यासक्रम हा नरसाल्याप्रमाणे आहे ज्यामध्ये विद्यार्थी हा मोठ्या बाजूने आत जातो आणि बाहेर येताना तो निमुळत्या बाजूने येतो . म्हणजेच तो जसजसा तो शिकत जातो तसा त्याचा फोकस हा कमी होत जातो त्यामुळे त्याला बाहेर संधी मिळत नाही . त्याउलट आता अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलले पाहिजे ज्यामध्ये हळूहळू विध्यार्थ्याचा फोकस वाढत गेला पाहिजे . ज्यावेळी तो शिकून बाहेर पडेल त्यावेळी त्याला संधीच संधी दिसल्या पाहिजेत .
लेख थोडासा अपूर्णच आहे .मुद्दाम विचारमंथन व्हावं यासाठी अपुरा ठेवला आहे ...
तुमच्या विचारांचे स्वागत .......
चित्तरंजन महाजन
९७६३७१४८६०
डॉल्फिन लॅब्स

**** आकाशी झेप घे रे पाखरा ********


सर्व साधारणपणे २०१५ -१६ ची गोष्ट असेल . एक दिवस अचानकपणे इंगळे सरांचा फोन आला . त्यांचे एक मित्र होते वानखेडे म्हणून त्यांच्या मुलासाठी सल्ला पाहिजे होता . मग मी वानखेडेना मुलाला शुभमला घेउन डॉल्फिन लॅब्स मध्ये बोलावल.
अक्खी फॅमिलीच आली . विचारपूस करताना कळल कि वानखेडे साहेब हे महावितरण मध्ये मोठ्या पोस्टवर काम करत होते आणि त्यांचा मोठा मुलगा सिंहगड कॉलेज वडगाव मध्ये इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन शिकत होता . पहिल वर्ष झाल आणि अचानक पणे काय झाल दुसर वर्ष शिकताना त्याचा अभ्यासातुन इंटरेस्ट गेला होता. त्याच वर्ष डाउन झाल होत . नंतरही त्याची अभ्यास करायची इच्छा उडून गेली होती . त्यामुळे विषय सुटत नव्हते . घरात बसून निव्वळ एका मोठ्या स्क्रीन च्या संगणकावर बसून रात्र रात्र फक्त व्हीडीओ गेम खेळत बसायचा . अजिबात अभ्यास करत नव्हता . पुढ शिकायची इच्छाच संपली होती .त्यामुळे दोघ नवरा बायको पण जाम टेन्शन मध्ये होते .
बोलत असताना माझ लक्ष्य शुभम कडे होत . कशीतरी दाढी वाढली होती , चुळबुळ चालू होती आणि डोळे पण अस्थिर होते . कदाचित व्हीडीओ गेम जास्त खेळत असल्याचा परिणाम होता . चार शब्द बोललो तर त्यामध्ये आत्मविश्वास नव्हता . हे लोक पार करियर कौन्सिलरचा सल्ला घेउन आले होते . पार ब्रँच बदलून आर्ट्स किंवा कॉमर्सला अॅडमिशन घेण्यापर्यंत विचार चालू होता . अगदी शेवटचा पर्याय म्हणून माझेकडे आले होते .
मी मग पालकांना थोड चहाच्या निमित्ताने बाहेर पाठवलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली . सुरुवातीला त्याच्या बोलण्यात काहीही सुसंगतपणा नव्हता काहीही उडवाउडवीची उत्तरं देत होता . मग मीच थोडस झापलं. आणि त्याला जाणीव करून दिली कि त्याला शेवटची संधी आहे विचार करण्याची . मग तो सांगू लागला कि कॉलेजमध्ये फक्त थेअरी होते आणि प्रॅक्टिकल जास्त डिस्कस केलं जात नाही त्यामुळे त्याचा इंटरेस्ट संपला होता. नेमकी कळ सापडली .
मग पुढ बोलन चालू झाल . जर त्याला सर्व प्रक्टिकली शिकवलं तर शिकशील का ? तो होय म्हणाला .
लगेच त्याच्या आई वडिलांना आत बोलावलं आणि प्लानिंग सुरु केल. त्याचे बरेच विषय राहिले होते . दुसऱ्या सेमची इनसेम पण जवळच आली होती . मग त्याला डॉल्फिन लॅब्स जॉईन करायला सांगितली . त्याचबरोबर मी माझे सहकारी सीमा राजपूत मॅडम , नचिकेत गायकवाड सर , भरते सर , यावले सर यांच्यासोबत चर्चा करून त्याला थोड शिकवण्यासाठी विनंती केली . हे शिक्षक म्हणजे विषय अगदी कोळून पिलेले असल्याने मला खात्री होती . त्यांनीपण माझ्या विंनतीला मान देउन त्याला शिकवायची तयारी दाखवली .
मग त्याचा दिनक्रम ठरवला. दिवसातील काही वेळ कॉलेजमध्ये येउन विषयाचा अभ्यास . त्यानंतर डॉल्फिन लॅब्सला प्रॅक्टिकल हँड्सॉन सुरु झाल .इन सेम झाली .पेपर चांगले गेले . मग त्यालापण हुरूप आला . अभ्यास करू लागला . शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे तिसऱ्या वर्षाला गेला . आता गाडी रुळावर आली होती .
पुढे त्यान एम एस केलं आणि सध्या अमेरिकेत एक चांगल्या कंपनीत काम करत आहे ...
डॉल्फिन लॅब्सच्या मुळे अजुन एक आयुष्य मार्गाला लागलं...