Thursday, May 9, 2024

^^^^^^नवीन शिक्षण पद्धती – अमुलाग्र बदलाची गरज ^^^^^^


आज काल नवीन शिक्षण पद्धतीवर सगळीकडे विचार मंथन सुरु आहे . अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राने तर हे खूपच मनावर घेतले आहे . बरेच महान वक्ते आणि अभ्यासक यावर विचार मांडत आहेत त्यामुळे माझं लिहीन म्हणजे सूर्यासमोर पणतीचा प्रकाश. पण याचा अर्थ विचार मांडूच नये असा नाही त्यामुळे हे लिहित आहे .
नवीन शिक्षण पध्दती मध्ये बरंच सगळ नवीन आणलं आहे . चांगली गोष्ट आहे. बदल हा घडलाच पाहिजे पण आपल्याकडे बदल हा गांभीर्याने घेतला जात नाही . आपल्याकडे बदल म्हणजे जुन्या बाटलीला नवीन लेबल लावलं म्हणजे झाल . नवीन शिक्षण पद्धतीत आता आता हे बदलायची गरज आहे .आता इथं केवळ बाटलीच नव्हे तर बाटलीच्या आतील पदार्थ सगळंच बदलायची गरज आहे . केवळ हे पदार्थच नाही तर ते पदार्थाचे डोस द्यायची पद्धत सुद्धा बदलायची गरज आहे . या अनुषंगाने विचार केला तर हे करत असतांना महाविद्यालय , स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठे (याठिकाणी विद्यापीठ म्हणजे स्वायत्त विद्यापीठ ज्याला इतर महाविद्यालये जोडलेली नाहीत असा आहे ). यामध्ये द्यायच्या शिक्षण पद्धती मध्ये आमुलाग्र बदल केला पाहिजे . कारण यांचे प्रत्येकाचे उद्देश हे वेगवेगळे आहेत आणि यातील सीमारेषा अगदी धूसर आहे . तसा हा विषय खूपच मोठा आहे त्यामुळे हळूहळू बदल कुठे झाले पाहिजेत यावर जमेल तस लिहित जाईन .
बदल करत असताना सध्याचा जो एक तास एक विषय हा असा एका दिवसात चार विषय थेअरी आणि एक प्रॅक्टिकल ढाचा हा मोडला पाहिजे . किमान विद्यापीठ पातळीवर तर झाला पाहिजे . थेअरी आणि प्रॅक्टिकल हे आता वेगवेगळ घ्यायची पद्धत पण आता मोडीत काढली पाहिजे . मुळात विषयांची जी अनावश्यक संख्या वाढवली आहे ती कमी केली पाहिजे आणि तास पद्धती ऐवजी सुरवातीला आठवड्यातून तीन तीन दिवस एक विषय असे दोन विषय एका आठवड्यात शिकवणे असे स्वरूप ठेवले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात प्रात्याक्षिके झाली पाहिजे . विद्यार्थ्याला विषयाची ओळखच हि प्रात्यक्षिकातून झाली पाहिजे मग त्या विषयाची मांडणी हळूहळू विषय जाणून घेणे आणि नंतर त्या विषयाची खोली वाढवत नेणे असा प्रवास झाला पाहिजे . म्हणजेच सेमिस्टरच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यात एक विषय तीन दिवस असे स्वरूप पाहिजे . नंतरच्या महिन्यात एक विषय एक दिवस आणि तिसऱ्या महिन्यात मग एक तास एक विषय अस स्वरूप झाल पाहिजे .
सुरुवातीला विचार केला तर हे अवघड वाटेल पण जर शांतपणे विचार केला तर हे एकदम सोप आहे .उलट या पद्धतीत बऱ्याच गोष्टीची कटकट कमी होईल.
आता या प्रकारे विषय शिकवण्यासाठी विषय शिकवण्याच्या पद्धती मध्ये पण बदल करायला लागेल . अभ्यासक्रमाचा ढाचा हा पूर्णपणे बदलावा लागेल. विषय हे प्रात्यक्षिकच्या रुपात मांडले जातील त्यामुळे विध्यार्थाना पण विषय चांगले समजतील.
सध्याचा अभ्यासक्रम हा नरसाल्याप्रमाणे आहे ज्यामध्ये विद्यार्थी हा मोठ्या बाजूने आत जातो आणि बाहेर येताना तो निमुळत्या बाजूने येतो . म्हणजेच तो जसजसा तो शिकत जातो तसा त्याचा फोकस हा कमी होत जातो त्यामुळे त्याला बाहेर संधी मिळत नाही . त्याउलट आता अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलले पाहिजे ज्यामध्ये हळूहळू विध्यार्थ्याचा फोकस वाढत गेला पाहिजे . ज्यावेळी तो शिकून बाहेर पडेल त्यावेळी त्याला संधीच संधी दिसल्या पाहिजेत .
लेख थोडासा अपूर्णच आहे .मुद्दाम विचारमंथन व्हावं यासाठी अपुरा ठेवला आहे ...
तुमच्या विचारांचे स्वागत .......
चित्तरंजन महाजन
९७६३७१४८६०
डॉल्फिन लॅब्स

No comments:

Post a Comment