*** उद्देश हरवत
चाललेली अभियांत्रिकी शिक्षण पद्धती ***
आपल्या भारतातील अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीची उतरंड हि चढत्या भाजणीने दहावीनंतर आय. टी. आय. /डिप्लोमा
, बारावीनंतर बी. ई., बी. ई. नंतर एम. ई.
त्यानंतर पी. एच. डी. अशी आहे. या उतरंडीतील प्रत्येक शिक्षण पायरीचा स्वत:चा एक
उद्देश ठरविलेला आहे.
आय. टी. आय. शिक्षणाचा उद्देश हा कुशल कामगार घडवणे असतो . तसा डिप्लोमाचा विद्यार्थी हा कुशल कामगारांवर
देखरेख करण्यासाठी सुपर वायजर म्हणून काम करण्यासाठी असतो . डिग्रीच्या विद्यार्थी कडून एखाद
प्रोडक्ट बनवण्याची अपेक्षा केली पाहिजे तर संशोधनाच्या कामासाठी एम. ई. चा
विद्यार्थी घडवले पाहिजे.
मध्यंतरीच्या काळात एक मोठी गडबड झाली. बाजारात मागणी वाढली
तशी भरमसाठ महाविद्यालये निघाली.स्पर्धा वाढली तसा घोळ व्हायला सुरुवात झाली. मध्येच
प्रोजेक्ट विके बाजारात आले त्यांचीही संख्या वाढायला लागली तशी
त्यांचेमध्ये पण स्पर्धा वाढली. नवनवीन प्रोजेक्ट तयार बाजारात यायला लागले . नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रोजेक्ट
विक्यांनी करायला सुरुवात केली. सुरुवातीला शिक्षकानाही जाणवत होत कि तयार प्रोजेक्ट
आणला आहे पण कागदपत्रात गुंग झालेमुळे त्यांनी त्याचेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात
झाली . नंतर या तयार प्रोजेक्टनी स्पर्धेत बक्षीस मिळवायला सुरुवात केली त्याच
श्रेय पण शिक्षकांना मिळायला लागले मग काय ? तयार प्रोजेक्टला उत यायला सुरुवात
झाली .
अशातच आठवी पर्यंत ढकललेली मुल अभियांत्रिकीला यायला सुरुवात झाली. महाविद्यालयांची
संख्या वाढलेमुळे कमी गुणवत्तेची मुलेपण अभियांत्रिकी शिक्षणाला पसंती देउ लागली. या
मुलांच्या बुद्धीचा वकूब ध्यानात न घेता त्यांचेवर प्रोजेक्ट लादायला सुरुवात झाली
. त्यांना जमत कि नाही याचा विचार न करता नवीन कल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या
प्रोजेक्टची शिक्षकांनी मागणी करायला सुरुवात झाली. आता तर शिक्षक म्हणतात
नामांकित जर्नल बघा आणि त्यातील कल्पनेवर प्रोजेक्ट करा .पेटंट करा. नामंकित जर्नल
कुठून मिळवायचं आणि ते कसं वाचायचं
याबद्दल शिक्षकांनापण माहिती नाही . विद्यार्थ्यांना
विकत घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
अशा रीतीने मग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट
डिग्री लेव्हलचा व्हायला लागला. डिग्रीच्या मुलाचा प्रोजेक्ट एम. इ. लेव्हलचा
व्हायला लागला. मुलांच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या. मग प्रत्येक शिक्षण पद्धती आपल्या
ध्येयापासून हळूहळू ढळू लागली आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली . सुदैवाने आय. टी.
आय.ने अजून ध्येयापासून फारकत घेतली नाही. त्यांनी आधीच आखून दिलेल्या सीमारेषेतच
सर्व कार्य सीमित ठेवले. त्यामुळे आय. टी. आय. चे महत्व अजूनही कायम राहिले आहे . पण
तंत्र शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा पार बोऱ्या वाढायला सुरुवात झाली आहे.
आता गरज आहे शिक्षण तज्ञानी परत एकत्र येण्याची आणि या सगळ्या गोष्टीची पुनःर्रचना
करण्याची...परत सीमारेषा आखण्याची ... हि ढासळत चाललेली उतरंड परत व्यवस्थित
करणेची ..... शक्य तितक्या लवकर हे केलेच पाहिजे अजूनही वेळ निघून गेलेली नाही.
नाहीतर .......
आपली मते
ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
या पूर्वीचे भाग
वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य
भेट द्या.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०
No comments:
Post a Comment