Sunday, May 24, 2020

करोना..... कुछ तो करो ना.

ज्यावेळी संकटे येतात त्यावेळीसच केवळ माणसाचीच नाही तर समाजाची खरी परीक्षा होते. कठीण परिस्थितीत समाज कसा सामोरा जातो त्यावरून त्याची सामाजिक , मानसिक , वैचारिक पातळी दिसून येते.
प्रसंग १ :गेल्या पावसाळ्यात महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूपच अवस्था बिकट झाली होती. गावेच्या गावे पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडली होती. लोक बाहेर पडायला काही नाही म्हणून घरातच आणि काहीतर घरावर अडकली होती. काय करायचं हेच कळत नव्हत , नावा ,होड्या अपुर्या होत्या त्यामुळे लोकांना बाहेर काढता येत नव्हत. सगळीकडे हतबलता आली होती. कधी कधी विचार करतो कि हतबलता कशानं आली होती तर आम्ही शिकलेली लोक विचार करायाची क्षमता गमावून बसलो आहोत आणि आम्हाला काहीही स्वत: करायची इच्छा नाही आम्ही फक्त बघे झालो आहोत. इतक पाणी आल असताना आम्ही आमच डोक गमावून बसलो . एक दोन कमी शिकलेल्या माणसांनी अक्षरशः मोठ्या काहीलीचा वापर करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले पण आम्ही आमची बुद्धी लावू शकलो नाही. सांगली आणि कोल्हापूर भागात डझनाने इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यात शिकणारी हजारो पोर . प्रत्येक कोलेजला वर्कशोप आहे पण आमची बुद्धी चालली नाही कि मुलांचा वापर करून पत्रे वगैरे जोडून पटकन काही नावा बनवाव्या. किंवा मुलांच्या लक्षात आल नाही कि आपल्या आसपास हजारो प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांचा वापर करून एखादा तराफा बनवावा. त्यावेळी मी दोन इंजीनियारिग कोलेजला संपर्क केला पण त्याचं म्हणन पडल कि हे आपल काम काम नाही. खर तर जाहिरात करायची मोठी संधीपण होती.
प्रसंग २: सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागणारी सुरक्षाप्रणाली खूपच तुटपुंजी आहे. त्यात चीनमधून आम्हाला आयात करायची इतकी सवय लागली आहे कि आम्ही आमच्या देशात पर्यायच उभे करू दिले नाही . चीनची वस्तू स्वस्त आणि आमची वस्तू महाग का ? यावर कधी पर्यायच शोधला नाही. नोकर बनवण्याच्या नादात आम्ही मुलांच्या विचारशक्तीला वावच दिला नाही . आज आमच्याकडे वेनटीलेटरचा तुटवडा पडू शकतो त्याला पर्याय शोधण्याची गरज आहे .आजच लोकसत्ताला आल आहे त्याप्रमाणे बऱ्याच वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे त्यावर विचार मंथन व्हायची गरज आहे पण यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. यावेळीपण काही ठिकाणी संपर्क केला पण काहीही रिस्पोंस नाही.
आज आपल्या इंजिनियरनी भरलेल्या देशात आपत्तींना कस तोंड द्यायचं हेच कळत नाही . प्रत्येक गोष्टीसाठी हाय टेक पर्याय शिकवल्यामुळे या मुलांना आसपासच्या गोष्टीपासून एखादी गोष्ट कशी बनवायची हेच कळत नाही. आपले विद्यार्थी हेच आपल भविष्य आहे हे कुणी लक्ष्यातच घेत नाही. नशीब अजून करोना आटोक्यात आहे पण पुढच्या क्षणाला काय वाढुन ठेवलं आहे हे सांगता येत नाही . तरी ज्यांना मनापासून वाटत कि आपण आपल्या देशासाठी कांही करू शकतो त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या साधनाचा वापर करून काय करता येईल हे शोधल पाहिजे. अनलिमिटेड इंटरनेट पॅकचा खऱ्या अर्थाने वापर करायची वेळ आली आहे .
नक्कीच कुणाला काहीतरी सापडेल . उगा अफवा फोरवर्ड करण्यापेक्षा आणि अफवा वाचत बसण्यापेक्षा , चघळत बसण्यापेक्षा काहीतरी धीराच्या गोष्टी शोधा आणि त्या पसरवा. लोक अखेर आशेवरच जगतात. कालच परभणीच्या एका मुलाने केलेलं व्हेन्तिलेटरच मॉडेल पाहिलं . तस ते मॉडेल खूपच प्राथमीक अवस्थेत आहे पण तरीही त्याला सलाम केला पाहिजे . त्याने केलेल्या मॉडेल मुळे कितीतरी लोकांना उत्साह आला. सध्या मी एका ग्रुपच्या सोबत आहे त्यांनी पण त्याचं डिझाईन पूर्ण करत आणल आहे. दोन तीन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माझी सर्व अभियंत्याना विनंती आहे. कुणीतरी काहीतरी करील यावर बसू नका .प्रत्येकाने काहीतरी हातभार लावावा . कुठेतरी सुरुवात केलींच पाहिजे कदाचित यातून नवीन संधी तयार होतो.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

No comments:

Post a Comment