Sunday, March 15, 2020

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****
“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)
प्रसंग पहिला : अशाच एका कॉलेजाला भेट द्यायला गेलो होतो. संस्थेचे डायरेक्टर त्यावेळी संस्था ऑफिसला होते. आधीची थोडी ओळख होतीच .म्हटलं चला भेटावं. भेटायला गेलो डायरेक्टरसाहेबांच्या पुढे काही माणस उभी होती आणि समोर एक चेक पडला होता त्यावरून ते हुज्जत घालत होते कि इतकं बिल कस झालं . जवळपास सोळा मिनिटे यावर विचारमंथन झाल आणि त्या चेकवर नंतर सही करतो म्हणून त्या माणसाना बाहेर पाठवल. सहज चेकवर नजर पडली . चेक होता फक्त १६० रुपयाचा. खूपच वाईट वाटले . जवळजवळ बत्तीस वर्षाचा इतिहास असणाऱ्या संस्थेच्या डायरेक्टरवर १६० रुपयाचा चेकवर सही करायला लागणे आणि ती सही करताना सोळा मिनिट वाया घालवायला लागणे यासारखी वाईट गोष्ट नव्हती.
थोडा वेळ गेला मग डायरेक्टर साहेब बोलायला लागले. काय सांगू सर ,एके काळी आमच्या इथे डोनेशन चालत होत पण आता अॅडमिशन होत नाहीत. लोकांचे पगार सहा सात महिने झाले आहेत थकले आहेत. गेले चार पाच वर्ष झाले हे असेच चालले आहे. मी विचारले मग मॅनेजमेंटच पुढ काय प्लानिंग आहे. ते म्हणाले काय आता या वर्षी एक कोटी दहा लाख रुपये खर्चून नॅशनल लेव्हलच खेळाच मैदान तयार केल आहे. क्षणभर डोक भंडावलं. म्हटल विद्यार्थ्यासाठी मग ट्रेनिंग च कस काय ? लगेच रडायला सुरुवात … काय सांगायचं सर , हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*******
प्रसंग दुसरा : असच एका कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी बोलणी करायला बोलावल होत . कॉलेज तस शहरापासून दूरच होत. कॉलेज मधून डिपार्टमेंटकडे चाललो. लंच ब्रेक होता . कट्ट्यावर , जिन्यात ,पायऱ्यावर मुले निवांत बसली होती. प्रत्येकाच्या हातात अन्द्रोइड फोन होता . निवांतपणे whats app वर चाटिंग वगैरे चालू होत. कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नव्हता, अगदी तंद्री लागली होती.
एच. ओ. डी. ना भेटलो . एच. ओ. डी. नी सागितलं कि त्यांना मुलांच्या प्रोजेक्टसाठी वर्कशोप पाहिजे. म्हटल काही काळजी करू नका आपल्या ट्रेनिंग नंतर त्यांना प्रोजेक्ट करायला नक्की जमेल . एच. ओ. डी. म्हणाले पण आमच्या मुलांना प्रोग्रामिंग येत नाही. मी म्हणालो हरकत नाही सर या वर्कशोप नंतर त्यांना प्रोग्रामिंग सुद्धा जमेल . एच. ओ. डी. ना त्यांच्या मुलाविषयी विश्वास होता त्यामुळे ते परत म्हणले आमच्या मुलांना अजून पार्टसची नावे पण माहित नाहित . आता आमचा आमच्या ट्रेनिंग वर विश्वास होता म्हणून मी म्हणालो काही काळजी नको मुल त्यांचा प्रोजेक्ट ते स्वत: करतील . मग म्हणाले ठीक आहे पण तुमची वर्कशॉपची फी जरा जास्तच आहे . आता मला यांच्यासमोर काय बोलाव कळेना. ते म्हणाले आहो आताच आमच्या मुलाकडून इंडस्ट्री व्हिजीट गोव्याला जाणार आहे चार दिवसासाठी म्हणून पैसे घेतले आहेत. आता पुढच्या आठवड्यात गॅदरिंग आहे त्याचा पण खर्च आहे सध्या त्यामध्ये पोर गुंतली असल्याने आपल्याला या आठवड्यात वर्कशॉप घेता येणार नाही . वास्तविक पाहता त्या मुलांनी इंडस्ट्री व्हिजीट साठी जितके पैसे भरले होते त्याच्या पंधरा टक्के इतकीच फी मी तीन दिवसाच्या वर्कशोप साठी मागितली होती.
काय करायचं ? आणि लगेच पुढच पेटंट वाक्य सुरु झाल आमची पोर गरीब आहेत .हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*****
आता मात्र माझी थोडी सटकली. आणि दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट घडली. मी म्हणलो सर, हि गरीब पोर तुम्ही कॉलेजला घेताच कशाला ? हि पोर खरीच गरीब आहेत का ? पंधरा हजार रुपयाचा मोबाईल फोन वापणारी मुले हि गरीब कशी म्हणायची. आणि असली हि दलीन्द्री पोर तुम्ही किती काळ सांभाळणार आहात . हि पोर गरीब नाहीत तर त्यांना माहित आहे कि आज तुम्हाला त्यांची गरज आहे . हे चित्र बनवलं कुणी.? हि पोर पण इतकी डोक्यावर बसली आहेत कि वर्गात लेक्चरला बसत नाहीत , प्रॅक्टिकलला येत नाहीत . सबमिशन करत नाहीत . इतकी माजली आहेत . आपल्याला हि किंमत पण देत नाहीत. कशीबशी पास होतात . प्रॅक्टिकल आणि टर्म वर्कला आपणच मार्क देतो ना . यांना ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत मग यांची प्लेसमेंट कशी होणार ? प्लेसमेंट नाही तर कॉलेजच नाव कस उजळणार . त्याशिवाय पैसे देणारी चांगली मुले कशी येणार ? हि मुल गरीब नाहीत तर आपली मानसिकता गरीब झाली आहे. इंजिनियरिंगच्या मुलांना ज्याचं प्रॅक्टिकल ज्ञान चांगल आहे त्यांना जॉब हे आहेतच . भारतातच नव्हे तर जगभर जॉब आहेत. पण आम्ही आमची मानसिकता बदलली पाहिजे . आम्ही आता आमचे विचार बदलले पाहिजेत . आपल्याला या असल्या गरिबांची किळस आली पाहिजे . आपल्या कॉलेजला चांगले विद्यार्थी यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
आता संस्थेन पण ठरवलं पाहिजे कि आपल्याकडे डोनेशन देणारी पोर आली पाहिजेत त्यासाठी काय कराव ? शिक्षकांनी पण विचार केला पाहिजे कि आपल्याला सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला पाहिजे आणि तो पण प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला. हे स्वप्न रंजन नाही हे शक्य आहे. आमच्या पुण्यातच एक कॉलेज अस होत कि २०१० पर्यंत त्या कॉलेजला टुकार मानण्यात येत होत पण त्यांनी ठरवलं आता बदलायचं, आता त्यांची जवळजवळ चार कॉलेज आहेत . डबल इनटेक , फुल अॅडमिशन विथ डोनेशन. अर्थातच हे करण्यासाठी चार ते पाच वर्षाचच प्लानिंग केल पाहिजे आणि त्याबरोबरच कष्ट करन्याबरोबरच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवली पाहिजे .
आता गरज आहे ही गरीब विचारसरणी बदलण्याची कारण ही जर बदलली नाही तर अवघड आहे....खूपच अवघड आहे.
मॅनेजमेंटच पण आणि शिक्षकांचं पण.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment