Tuesday, September 5, 2023

### OUT Box Thinking ---- शिक्षण क्षेत्रापुढील नवीन आव्हान ###

 डॉल्फिन लॅब्स   माध्यमातून काम करताना आमचा अगदी चौथीपासून ते पार पी. एच डी पर्यंतच्या विद्यार्थ्यानशी संबध येतो . एव्हढ्या मोठ्या शिक्षण पटावर अभ्यास  करणारे दुसरे कोणी भारतात नसेल .  हा  अभ्यास करताना  महत्वाची आणि नवीन गोष्ट लक्षात आली आणि तिच्याकडे शिक्षण संशोधकाच अभ्यासासाठी लक्ष गेलेले नाही . 

आमच्याकडे काही पालक त्यांच्या मुलांना घेउन यायचे आणि तक्रार करायचे कि हा अभ्यास करत नाही . शांत नाही ,अतिशय चंचल आहे . याच अभ्यासात लक्ष्य नाही पण याला इलेक्ट्रोनिक्समध्ये खुपच लक्ष आहे . सारख  बॅटरी, वायर सारख्या गोष्टीमध्ये रमत असतो. घरातील वस्तू खोलत असतो .  

अशा विद्यार्थ्यांचे निरीक्षण करत असताना एक  गोष्ट जाणवली कि या मुलांची चेहरेपट्टी हि उलट्या  त्रिकोणी असते . कदाचित या गोष्टीचा उल्लेख माझ्या याआधीच्या लेखातही ओझरता केला असेल . यांची हनुवटी हि निमुळती असते.  या हनुवटीच्या आकारावर पण बऱ्याच गोष्टी समजत  असतात . अशा जवळजवळ प्रत्यक्ष  शंभरच्या वर  विद्यार्थ्यावर काम केलं  आणि अप्रत्यक्षपणे भरपूर  मुलांचा अभ्यास झाला आहे . 

माझ्या संपर्कात आलेले  अमय महाजन ,  तलहा शेख ,मोएझ पठाण , आयुष जाधव , सोहम मंत्री , किशन घाटोळे, शुभम वानखेडे , शुभम ठोंबरे अशी बरीच नावे घेता येतील . बरीच लिस्ट मोठी आहे पण हि मोजकी नावे ज्यांच्याशी माझ्या फेसबुकवरील मित्रांचा कधी ना कधी संबंध आलेला आहे . यातले काही जण नापास होते, काही जणांना अभ्यासात  मार्क्स चांगले नसायचे . पण आज यातले व्यवस्थित मार्गावर आहेत. काही परदेशात आहेत आणि काहींचा स्वतःचा उद्योग पण आहे .

हा तर सांगायची गोष्ट म्हणजे हि त्रिकोणी डोक्याची मुल पहिली खूपच कमी दिसायची पण अलीकडे ज्यावेळी मी वेगवेगळ्या शाळांना भेट दिसतो त्यावेळी यांची संख्या वाढत चाललेली आहे . हि एका बाजून चांगली आहे पण दुसऱ्याबाजूने विचार करता हे चिन्ह पण चांगल नाही कारण शिक्षण  क्षेत्रात हि मुलाना समजून घेण्यासाठी काही पद्धती अजुन विकसीत नाही. कारण आजपर्यंत तुम्ही जर विचार केला तर या मुलांच्यावर शिक्षण क्षेत्राने अन्यायच केला आहे . जुन्या काळात हि मुल जास्त शिकायची नाहीत .   ठराविक चौकटीत बांधून ठेवणाऱ्या शिक्षण पद्धतीशी जमायचं नाही , मध्येच शाळा सोडायची . 

हि मूल खूपच चंचल आणि धरसोड करणारी असतात . त्यांचे लहानपणापासून बुद्धीचे व्यवस्थापन व्यवस्थितपणे झाले असेल त्यांच्यात एक ठामपणा पण दिसतो पण हे खूपच कमी निरीक्षणास आले आहे . आतापर्यंत जो अभ्यास सांगतो कि मुलांचा लक्ष्य देण्याचा टाइम स्पॅन हा १२.५  मिनिटाचा असातो तर या मुलांच्या बाबतीत तो तीन मिनिटापेक्षा पण कमी असतो.आणि आता मोबाईलच्या मुले हा अजुन कमी आला आहे . तर अशा मुलांच्या बाबतीत काय करायला पाहिजे याचा आता विचार करायला पाहिजे . कारण आता हि मुले बहुसंख्य आहेत  आणि यांची संख्या पण वाढत चालेलेली आहे .

याच्यावरही लिहिण्यासारखे खूपच आहे  आणि पुढे वेळ मिळेल तसा यावर लिहीतच जाईन. सध्या तुम्ही आसपासच्या या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करा ... काही अनुभव असेल तर अवश्य शेअर करा.


चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

 

Sunday, September 3, 2023

Out of Box Thinking- इलेक्ट्रॉनिकस इंजिनिरिंग- अस्तित्व गमावत चाललेली ब्रँच

यावर्षी बारावीचा निकाल चांगला लावल्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला परत भरती आली . त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या जागा पण भरल्या .अर्थात यामागचं कारण वेगळं आहे .एक तर बऱ्याच महाविद्यालयानी इलेक्ट्रॉनिक्स शाखा बंद केल्या आहेत, काही ठिकाणी इंटेक कमी केला आहेआणि कंप्यूटरला प्रवेश मिळाला नाही म्हणुन नाईलाजाने या ब्रॅंचला ऍडमिशन घेतलं आहे. त्यात पण एक चांगली आणि एक आशावादी गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक्सला  स्वतः हुन मनापासुन ऍडमिशन घेणाराची संख्या दोन चार टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळं यावर्षी इलेक्ट्रॉनिकची कळी  खुलली आहे. पण खरंच आमचं शिक्षण क्षेत्र त्यांना न्याय देण्यास सक्षम आहे का? याच उत्तर कुणीही कितीही ठामपणे होय म्हणून सांगितले तरी ते सत्य हे नसणार आहे. कारण ही शाखा सध्याच्या संधीला आणि आव्हानाला सामोरे जाण्यास अजिबात सक्षम नाही.

तुम्हाला ढोबळपणे सांगतो. 1990 - 91 ला  इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाणे कात टाकायला सुरुवात केली आणि अभ्यासक्रमातून व्हॅक्युम ट्यूब पूर्णपणे काढून टाकून ट्रान्झिस्टरवर  जास्त भर द्यायला सुरुवात केली.1998-2000 सालापासून मायक्रोकंट्रोलर फार्मात आला . 2005 पासून VLSI ला मार्केट आले आणि त्यानंतर 20०८ पासून ३२ बीट मायक्रोकंट्रोलर आणि RTOS अभ्यासक्रमात आले.

अर्थात हे यायला तसा उशीरच झाला . 2010 च्या आसपासून चित्र पालटायला सुरूवात झाली.महाविद्यालये वाढली. मुलांची गुणवत्ता कमी झाली..स्टाफची गुणवत्ता पण कमी झाली कारण महाविद्यालयांची संख्या वाढू लागली तसं स्टाफपण अपुरा पडू लागला . त्यातच उद्योगक्षेत्रातील संधी वाढत असल्यामुळे चांगली मुले प्लेस होऊ लागली होती . त्यामुळे  मिळतील  तसे स्टाफ भरले. कुठल्या स्टाफची क्षमता काय याचा विचारच केला नाही .

तशातच आठवीपर्यंत नापास नकरता धकलगाडीत बसवलेले विद्यार्थी पण आले.आता या विद्यार्थ्याचा निकाल चांगला लागावा म्हणून अभ्यासक्रमातील काठीण्य कमी करायला सुरुवात झाली .  जे इम्बेडेड सिस्टीम ज्यावर  आजचे पूर्ठीण इलेक्ट्रोनिक्स क्षेत्र अवलंबून आहे आणि आज जे  नोकरी मिळवण्यासाठी अतिशय  गरजेच असते त्याच्या मुळावरच घाव घालायला सुरुवात झाली .  C प्रोग्रामिंगवरच कुऱ्हाड चालवली. त्याच्यातील  पोइंटर , फाईल handling काढून टाकले . पुढे ८०५१  असेम्ब्ली प्रोगामिंग काढले , त्यातच PIC घुसडला .( PIC शिकणे पण गरजेच आहे पण त्याला वेगळा विषय बनवायला पाहिजे होता) . त्यामुळे  मायक्रोकांत्रोलरचा अभ्यासावर मर्यादा आली .  इंटर फेसिंग , प्रोग्रम्मिंग कमी केले . ३२ बीट आर्म  कंट्रोलर कसा शिकवायला पाहिजे यातच अक्षरशः पाच वर्षे बरबाद झाली ( हि एक वेगळीच गंमत आहे कारण मायाक्रोप्रोसेअर  कोअर आणि त्यावर डिझाईन केलेला मायाक्रोकांत्रोलर यातला फरकच अभ्यासक्रम करताना करणाऱ्याला कळला नाही  त्यामुळे शिकवलं एक आणि प्रोग्रामिंगसाठी लागणार ज्ञान मिळालाच नाही ).  

हळूहळू अभ्यासक्रमातील जो नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असा पार्ट काढला. आता तर VLSI एफ पी जी  ए प्रोगामिंगचे किट्स नाहीत  आणि RTOS शिकवायचा बंदच झाला आहे . नवीन किट्स घेण्याऐवजी सिमुलेटरवर  शिकवायला सुरुवात झाली आहे ज्याची  मजा मुलांना येत नाही . सध्या जो अभ्यास  इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी महत्वाचा आहे एकतर   तो सगळा काढून टाकला आहे किंवा त्याचे महत्व कमी केलं आहे .

आणखी एक बदल इथे सांगितला पाहिजे . सर्वसाधारणपणे १९७० च्या पूर्वी  इलेक्ट्रोनिक्सचे तंत्रज्ञान हे DC ४८V वर चालणारे होते . ८०-९० मध्ये ते २४ V वर आले , ९०-२००० च्या सुमारास 12V , २०००-२०१० पर्यंत 5V वर आले आणि २०१० पासुन २० पर्यंत 3.३V आले आणि आतातर ते १.८ Vवर हळूहळू शिफ्ट होत आहे . 

२०१० पासूनच बाजारातून ट्रान्सफोर्मर बेस्ड पॉवर सप्लाय दिसायचे बंद झाले आपण अजूनही अभ्यासक्रमात बराचसा भाग त्यावर वाया घालवत आहे .

सध्याच्या क्षेत्रासाठी कुठले विषय पाहिजेत तेच अभ्यासक्रम तयार करणाऱ्याना  ठरवता येत नाही . किट्स विकणारी टोळी जो अभ्यासक्रम बनवतात तो तोच विद्यार्थ्यांच्या कपाळी  मारला जात आहे . शिक्षकांची नवीन काही शिकण्याची मानसिकता नाही . काही स्वायत्त झालेल्या विद्यापीठात तर नवीन अभ्यासक्रम करताना केवळ  सिनियर स्टाफने  आजतागायत इतकी इतकी वर्षे त्या एकाच विषयाची पाटी टाकली म्हणून गरज नसताना सुद्धा तेच विषय ठेवले आहेत .

 इलेक्ट्रोनिक्सचे विषय कमी करून  जावा , पायथोन , जावा आणल जाऊ  लागल आहे  .  आणायला काहीही हरकत नाही पण त्याचा इलेक्ट्रोनिक्ससाठी पूरक असा वापर करण्या ऐवजी त्यांचा काही संबंधच दाखवला जात नाही .

आज तस पाहायला गेलो तर इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग जवळजवळ २० वर्ष मागे गेल आहे . त्यात आता इलेक्ट्रोनिक्सच  कम्प्युटर , मेकॅनिकल बरोबर कॉकटेल करायचं नवीन फॅड सुरु झालय (याच्याबद्दल लिहीनच ).

 ....एक मात्र खर  हळूहळू   इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग अस्तित्व  गमवत चालली आहे . आज जगात इलेक्ट्रोनिक्चास उदो उदो होत असताना सुद्धा या ब्रंचला स्वतःचा चांगला अभ्यासक्रम बनवता  येत नाही आणि  .शिकवताही हिच शोकांतिका  आहे .  

Friday, September 1, 2023

**** Out of Box Thinking - अजुन थोड आणि बरंच काही *****

आता पर्यंत मी डॉल्फिन लॅब्सच्या माध्यमातून कार्य करत असताना अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर बरेच संशोधन केले . त्यामुळे माझ्याकडे लिहिण्यासारखे आणि करण्यासारखे खूपच आहे . त्यामुळे दररोज जरी लिहित बसलो तरी पुढची चार पाच वर्षे तरी संपणार नाही .खर म्हणजे आता  लिहिण्यातही अर्थ  वाटत नाही कारण आता हे क्षेत्र खूपच पुढ गेल आहे आणि जवळजवळ संपलंच आहे . आता तुम्ही मान्य करत नाही कारण तेह्वढी मानसिकता पण उरली नाही . कारण जर असती तर सुधारणा करायला मागेच सुरुवात झाली असती . 

आता हेच बघाना पोरग शिकत एलेक्त्रीकल , मेकॅनिकल , इलेक्ट्रोनिक्स ,सिव्हील आणि प्लेस होत कॉम्पुटरच्या पोराबरोबर आय .टी .मध्ये म्हणजे इतके पैसे घालून, परीक्षा देवून डिग्री घेतली तिचा फायदा काय ? त्या ज्ञानाच काय करायचं अर्थात ते चार वर्षात किती मिळवलं हा प्रश्न आहेच . आणि सगळ्यात केविलवाणी अवस्था म्हणजे कॉम्पुटरची .अस काय वेगळी ब्रंच घेउन झेंडे लावले जर इतर मुलांच्याबरोबर प्लेस व्हायचे होत तर? . बर हे सगळ करून परत कंपनीत घ्यायचं ट्रेनिंग ते वेगळंच  .

हे म्हणजे  अस झालय कि दवाखान्यात पेशंटन जायचं  कारण  डॉक्टर जगायला पाहिजे, डॉक्टरने दिलेली औषधे घ्यायची कारण केमिस्ट जगला पाहिजे आणि आणलेली औषधे कचऱ्यात टाकायची कारण स्वत : पण जगल पाहिजे . 

सगळा इस्कोट झालाय कुणाला कशाचा ताळमेळ नाही . आपल्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मुलांना आय. टी. ला घालवायची इतकी घाई झाली आहे कि त्याना प्लेसमेंटला  एन्ट्री मिळवायला लागणारी मार्क्स दिली कि आपली जबाबदारी संपली अस वाटत . मग काय कशीही मार्क्स फुगवा ..... त्यामुळे Out of Box Thinking ला कुणाला वेळच नाही आणि ते जमायला पण पाहिजे .

मला कधीकधी आश्चर्य वाटत कि चायनाची प्रोडक्ट्स तुम्ही बघा इतके वेगवेगळे व्हरायटी मिळतील . परवा तर वेणी घालण्याच सुद्धा मशीन त्यावर पाहिले . किती प्रोडक्ट्स ते बनवतात . डोक्यात कधीकधी विचार येतात कि काय चालाल काय आहे आपल्याकडे. 

इतकी सोपी प्रोडक्ट करायचं आपल्याला कस सुचत नाही तर याला कारण आहे आम्ही आमच्या मुलाचं बौद्धिक खच्चीकरण चालवल आहे. याची सुरुवात खूपच आधीपासून होते .

आपल्याकडे मुलगा पाचवी सहावी पर्यंत जाऊपर्यंत पालक मुलांचे खूपच कौतुक करतात . त्याला प्रत्येक गोष्टीत विचार मांडण्याची संधी देतात, सातवीपर्यंत ऐकून घेतात आणि त्यानंतर बापच पोराला म्हणतो बापाला शिकवतो काय ? त्याबरोबर दहावीच भूत आठवीपासूनच मानेवर बसत  .. क्लासेस सुरु होतात . काही ठिकाणी तर आठवीपासूनच आय. आय. टी .कोचीगला घालतात . पोराची विचार शक्तीच कमी करून टाकतात . रट्टा मारायची सुरुवात होते. 

दहावी नंतर लगेच बारावी ... परत अभ्यासाची सुरुवात परत रट्टा... हि परीक्षा ती परीक्षा अस करून बौद्धिक गोटा झालेलं शेवटी ते  इच्छ्चेन, नाईलाजान अभियांत्रिकीच्या   प्रवाहात पडत . पहिल वर्ष सुरु होत. अर्थात आधीच महाविद्खुयालय चालू व्पहायला  उशीर झालेला असतो .. मग काय त्या बिचाऱ्याला उसंत सुद्धा मिळत नाही. पहिलं  वर्ष संपत. दुसऱ्या वर्षी ते त्याच्या शाखेत जात त्याला वाटत साल आता काहीतरी वेगळ घडेल पण तिथ वेगळीच तऱ्हा. 

डिपार्टमेंटला आलेवर त्याला शिस्त लागली पाहिजे म्हणून परत डिपार्टमेंटचा रट्टा . दुसऱ्या सेमला त्याला वाटत आतातरी दुनिया बदलेल पण नाही .तिसऱ्या वर्षाला त्याला शिंगे यायला सुरुवात होते आणि तिसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सेम पासुन पोरग मुर्दाड बनायला सुरुवात होतेआनी   Out of Box Thinking करण्यामधून बाहेर येत .... त्याला सगळी सिस्टीम समजलेली असते आणि कळून चुकते सगळ Xटू आहे .

त्यातूनच काही मुल क्लब करतात ,काही वेगळी वाट चोखाळतात पण त्यात त्यांना जागा देण आणि त्यांनी आणलेली पारितोषिक मिरवण यापलीकडे महाविद्यालय काहीही करत नाही . कारण सगळे पैसे मुलंच जमा करतात . अर्थात काही अपवाद आहेत पण फारच थोडे आहेत .

हि कागद जमा करण्याच्या नादात पोरांच्या मेंदूची रद्दी कधी होते हे ना पोराला कळत ...ना महाविद्यालयाला....आणि  Out of Box Thinking विषयीची FDP चालतच राहतात .....चालतच राहतात .

चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dolphinlabs.in


Thursday, August 31, 2023

 *** Out of Box Thinking  - कसं बनत  ***

आता विषयाला हात घातलाय म्हणून जे मनात विचार येतात ते मांडतो . 

१९९३ सालची गोष्ट . बारावी MCVC इलेक्ट्रोनिकला   होतो आणि डोक्यात आलं चला आपण काम्पुटर बनवूया . आता त्यावेळी काम्पुटरम्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. मग आता हे बनवतात कस  . मग काय मी आमच्या जे. पी . पाटील  सरांना विचारल . ते म्हणाले गावकरच मायक्रोप्रोसेसर वाच . मग लगेच सांगलीला जावून ताम्ह्नाकरांच्या तिथून ११० रुपयेला पुस्तक आनल. वाचायला सुरुवात केली घंटा काही कळत नव्हत .कितीतरी वेळा वाचायचो काहीच डोक्यात शिरायचं नाही . आमच्या सरांचं ज्ञान पण यथातथाच. पहिली पन्नास ते साठ पान सारखी वाचायचो . त्यापलीकडे काही गाडी काही जातच नव्हती . ते मायक्रोप्रोसेसर मधले रजिस्टर , इलेक्ट्रोनिक्स मधले रेजिस्तर आणि आपल्या दैनंदिन जीवनातले लिहायचे रजिस्टर कुठ मॅप होतच नव्हते . ते असेम्ब्ली प्रोग्रामिंग तर समजतच नव्हते . सर सांगायचे कि हे लाईन मूळ A मधलं B मध्ये जात .... अस बरंच काही सांगायचे . त्यांची पाठ मी सोडतच नसायचो . अगदी मी वेताळ कसा विक्रमाच्या बोकांडी बसतो तसा मी त्यांच्या मागे लागायचो  आणि वीस जणात मीच शिकायच्या इच्छेने आलो होतो त्यामुळे ते पण मला खूपच समजून घ्यायचे .   खुपच डोक्याची मंडई झाली होती . 

असाच एकदा दुपारी बसलो होतो आणि बहिणी खेळत होत्या . त्यांच्यामध्ये गाई गाई असा खेळ चालला होता . पाच पाच खड्डे काढले होते आणि त्यात खडे टाकत जायचं असं काहीतरी खेळ होता . बराच वेळ बघत होतो आणि अचानक डोक्यात उजेड पडला.  मी त्या खड्यांच्या जागी रेजिस्तर आणि खड्याच्या जागी आकडे दिसू लागले . आणि अचानक प्रोसेसरच बेसिकच कळून गेल . त्यानंतर असेम्ब्ली लँग्वेज , मायक्रोप्रोसेसर हे समजूनच गेले . मेंदूमध्ये त्यांचा एक सिमुलेटरच बनून गेला.

आज मायक्रोप्रोसेसर हा विषय सहावी सातवीच्या विद्यार्थ्याना शिकवता येण्यासारखा आहे पण त्या दिशेने प्रयत्न होतच नाही . आम्ही मागे एक प्रयोग केला होता आणि सहावी सातवीच्या मुलांना एफ पी जी ए प्रोग्रामिंग शिकवलं होत आणि कळून चुकल कि मायक्रोप्रोसेसर खूपच सोपा आहे .

आज जी साधने अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे त्यांच्या सहाय्याने मायक्रोप्रोसेअर स्वत : कसा बनवावा हे आता अभ्यासक्रमात पाहिजे पण हे शिकवणारी पद्धती विकसित केली पाहिजे .

******

डिप्लोमा झाला आणि डिग्रीला अॅडमिशन घेतलं . सेकंड इयरचा M3 निघाला नाही आणि तोवर EME बोकांडीवर बसला. त्यावेळचा EME म्हणजे काय सांगायचं ? त्याची धडकीच बसायची . EMEचे पेपर म्हणजे कुंभमेळाच असायचा . पाचपाच वर्षे विषय न सुटलेली आमचे सिनियर त्यावेळी यायचे . EME म्हणजे काय सांगायचं . पहिल्या वेळी १३ मार्क , दुसऱ्यावेळी १४ मार्क . आता या गतीने जायचे म्हणजे म्हटल आता मी पण सुपर सिनियर होणार वाटत .  त्यातच एक वर्ष वाय. डी . झाल . तिसऱ्यावेळी कोलेजच्या गच्चीवर पुस्तक घेउन गेलो आणि सहज डूलका

 लागला आणि स्वप्नात ते सगळे इलेक्ट्रोन्स दिसायला लागले . आणि अचानक मला तो विषयच समजून गेला . मी त्यावेळी पेपरला बसलोच नाही म्हटलं अजुन अभ्यास केला पाहिजे . मग हळूहळू तो विषय समजत गेला आणि आता तो विषय पण चांगला कळायला लागला ( माझ आणि maths च अजूनही जमल नाही बरका.. ) आणि चौथ्यावेळी विषय निघाला ५२ मार्क पडले पण विषय मात्र चांगलाच कळला.


******


डिग्री तिसऱ्या वर्षी नापास झालो आणि त्याचवेळी बॉम्बे फ्लाईंग क्लबच्या कॅ. आनंद बोडस याच्या संपर्कात आलो .त्यांच मायक्रोलाईट विमान बघून त्याचे बोट धरून थोड विमानशास्त्रात पण भटकंती करून आलो . त्तेयांनी फ्लाईट डायनामिक्स शिकायचं सल्ला दिला . मग कर्मोडेच पुस्तक वाचायचला सांगितलं  . त्यातही समजायची अडचण . एकदा असच त्यांना भेटायला गेलो होतो  एक शंका विचारायला . ते म्हणाले बस इथं . तिथच जमिनीवर वाळूत  बसले  आणि खाली पडलेली एक काडी घेउन   म्हणायले आरे हे अवघड नाही हे एकदम सोप आहे . तुझ मन मोकळ सोड आणि लक्ष दे . मग वाळूत रेघोट्या मारून त्यांनी मला एरो डायनामिक्सचे धडे दिले आणि पाया पक्का केला . आज एखाद मॉडेल बनवायचं तर लगेच टेस्टिंगसाठी विंड टनेलचे गरज भासत नाही फक्त नजरेन हवेचा विरोध कुठ आणि कसा होईल याचा अंदाज येतो .तशी त्यांनी मला नवीन दृष्टी दिली ..  

******


आज ज्या पद्धतीने हे विषय शिकवले जातात ते पाहिलं तर वाईट वाटत . सिमुलेशन, विज्युलायझेशन , वर्च्युलायाझेशनचा इतका  भडीमार सुरु केला आहे कि आपण विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमताच गमावुन टाकत आहे. विद्यार्थ्याना out of box  विचार करण्याची प्रक्रियाच थांबवून टाकली जात आहे . नोकर घडविण्यासाठीचा अभ्यासक्रम बनवायची स्पर्धा सुरु झाली आहे आणि बुद्धीचे खच्चीकरण होत चाललं आहे ...

Out of Box Thinking शिकवायला शिक्षण क्षेत्रात  माणसे आहेत का ..............?

 





 **** out of box thinking- ते काय असत भाऊ ****

२००७ साली मी जेव्हा  शिक्षकी पेशात आलो होतो Out of Box thinking केलं पाहिजे अस  त्यावेळी कायम ऐकायचो.सुरुवातीला त्याच मला खूपच अप्रूप वाटायचं . जो तो व्याख्याता यायचा तो याच विषयावर बोलायचा . अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये सुगीचे दिवस आले होते . व अडमिशन सगळीकडे जोरात होती  सगळीकडे उत्साह होता . 

        त्यावेळी मिशन १०X नावाचं विप्रोने   सरकारला द्यायचा कर  वाचावण्यासाठी एक नवीन कार्यक्रम तयार केला होता . ते ट्रेनर सांगायचे शिक्षकाने नेहमी Out of Box thinking केलं पाहिजे . ऐकायला लय भारी वाटायचं .( मजा म्हणजे यातल्या कुठल्याही ट्रेनरला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचा अभ्यास नव्हता. ) कुठून कुठून वाचलेल्या पुस्तकातल्या पोपटासारख्या सांगायचं .Bloom taxonomy ,Three bucket , Quiz ,Roll play  अस बरच काही असायचं त्यात . 

खुप वेगळच वाटायचं . वाटायचं कि आपणही अस काहीतरी केलं पाहिजे .  उत्साहान  कार्यक्रम अटेंड करून आलो होतो. आमच्या एच ओ डी ना सांगितलं सर अस अस ऐकल आहे आपण पण हे चालू केलं पाहिजे . आमचे  एच ओ डी नी पहिलाच धडा दिला . ते म्हणाले हे बघा , हे कार्यक्रम आपल्याला फक्त ऐकायचे असतात . त्यातलं आपल्याला राबवत बसायला वेळ नसतो . तुम्ही तुमचा अभ्यासक्रम वेळेत संपवला पाहिजे. त्यांचही खर होत . हि असली नाटकं करायला वेळही नव्हता . पोरांच्या टेस्ट , टीचर गार्डियन , त्यांच्यासाठी क्वशचन बँक तयार करा . त्यांची उत्तरे काढा , पी पी टी बनावा ( त्यावेळी इंटरनेटवर एव्हढ मटेरियल सहज मिळायचं नाही ), पोरांच्यासाठी ओरल क्वश्चन बँक करा अस बरंच काय काय करायचं असत . त्यात या उचापती कुठून करायच्या आणि कुणाला वेळ असतो त्यासाठी . 

आताच्या काळात तर शिक्षकाला शिकवायला वेळ नसतो . रोज नवीन फतवा . हे करा ते करा . NAAC चे काम , NBA उरावर , पेपर पाहिजेत , रिसर्च पाहिजे , यांव आणि त्यांव. कुठल्याही कॉलेजमध्ये जावा प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या मिटींगमध्ये बिझी ... साला कुणाला वेळच राहिला नाही . कुठून करणार Out of Box thinking.

Out of Box thinking करण एव्हढ सोप असत का ? 

Out of Box  विचार करणार पोरग, त्याचे  त्याच्या बापाला पटत नाही, ते शिक्षण क्षेत्राला झेपत नाही , नोकरी करताना सहकाऱ्याना आवडत नाही (काही तरी नवीन ख्याट काढत म्हणून ...) आणि समाजाशी त्याच कधी जमत नाही . अशा माणसाला जर खमका असा शिक्षक, वरिष्ठ, सहकारी   मिळाला तर त्याचा त्या संस्थेला , समाजाला फायदा नक्कीच होतो .पण अशी उदाहरणे विरळच आहेत.कितीतरी out of box विचार करणारे  समाजाने वाळीत टाकले आहेत . अशी कित्येक  वेगळ्या विचाराची  माणसे  समाजाने कुजवली, मारून टाकली . आपल्याकडे परंपराच आहे .इतिहास आहे . 

"बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको "  ,अशी जीवनशैली बाळगणारी माणसेच इथे  जीवनात यशस्वी  होतात. जास्त डोकं चालवणे म्हणजे सगळ्यांची नाराजी ओढवून घेणे असाच इथे अर्थ निघतो .

Out of Box thinking करायची सवय लहान वयातच लावायची असते. त्यासाठी विचार करण्यासाठी अभ्यासक्रमात जागा करायच्या असतात . अभ्यासक्रम हा लवचिक असावा लागतो . प्रत्येक मुलाचा वेगळा विचार करायला लागतो . हे आपल्या शिक्षण क्षेत्राला जमणार आहे का ? अभ्यासक्रम तयार करणाऱ्याला स्वतःचा कार्यानुभव लागतो. आपल्याकडे ज्याने कधीच शेती केली नाही तो शेती कशी करायची याचे धडे देत फिरत असतो त्यामुळे त्याच्या पद्धती उपयोगी पडत नाहीत . 

आता हे खूपच अवघड झाल आहे .... याच्यावर उपाय आहे .. आता नवीन स्वायत्त विद्यापीठे होत आहेत त्यांनीच मनावर घेतलं तरच  होईल .......... (हा एक भोळा आशावाद आहे कारण २००७ पासुन १६ वर्षे झाली हे अजूनही शिक्षण क्षेत्राला जमलेलं नाही  ).



चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

यापूर्वीचे लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या dearengineers.blogspot.com


Wednesday, August 30, 2023

 गेल्यावर्षीची गोष्ट आहे  एका गृहस्थाच्या घरी जायचा  जाण्याचा योग आला होता. गृहस्थ चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. घरात गेल्यावरच एक वेगळच वातावरण जाणवलं. या गृहस्थाची मुलीला करोनापुर्वी अपघात झाला होता त्यामुळे कमरेखाली हालचाल बंद झाली होती. एक वयात आलेली मुलगी म्हणजे आईवडिलांच्या डोक्यावर एक वेगळंच टेन्शन असतच ते कुणालाही चुकलेल नाही .

 काय करायचं पुढ हा प्रश्नच होता. आता मी काय बोलणार मुलगी तर फार्मसी झालेली आता इंजिनियरिंग झालेली असती तर काय आपल्याला काहीच टेन्शन नाही . कुठलीही ब्रांच असो आणि कितीही वेळा नापास असलं तरी अशाना मार्गी लावण्याचा आपल्याला चांगलाच अनुभव आहे पण हि पोट्टी तर फार्मसीची काय सांगणार?

 तस फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी पण खूपच संधी आहेत पण आमच्या अभियांत्रिकीच्या शिक्षण क्षेत्रासारख फार्मसीच्या शिक्षण क्षेत्राचं पण झाल आहे. ठराविक साच्याच्या बाहेर जावून विद्यार्थ्यांसाठी नवीन  संधी शोधायच्या , निर्माण करायच्या नावान तिथंही सावळा गोंधळच आहे . सध्याच्या काळासाठी  फार्मसिसाठी पण  टेक्निकल ब्रिज कोर्स बनवायला पाहिजे त्याला अजुन सुरुवातच नाही ( याला संदर्भ मी आता गेल्या आठ वर्षापासुन फार्मसी कॉलेजमध्ये जी काही एफ डी पी  आणि विद्यार्थ्यासाठी जे प्रोग्राम होतात त्याचे अभ्यासक्रम वाचले त्याचा आहे  ) आता काय बोलणार .  गावाकड जावून एखाद मेडिकल काढून द्याव या पर्यंत विचार येऊन ठेपला होता . 

तेव्हढ्यात मुलगी व्हील चेअर वर बसून आली . थोड्या गप्पा झाल्या आणि लगेच कळल पोरगी हुशार आहे आणि आपल्या पटात बसणारी आहे. मग माज्या डोक्यात पण एक विचार आला आणि मग मी बोलायला सुरुवात केली . पायथोनला डिमांड आलेली होती . मी पण पन्नास हजार रुपये भरून ज्ञानात भर टाकायला एक कोर्स केला होता त्यामुळे यामध्ये असणाऱ्या संधी लक्षात आल्या होत्या आणि त्या मला फार्मसीला मॅप कशा करता येतील याचा थोडा अंदाज आला . आणि समजा काहीच नाही झाल तर नवीन संधी निर्माण कशा करायच्या याचा  थोडा आराखडा बांधला. त्याच काय सल्ला देणं सोप असत पण त्याची जबाबदारीपण घ्यायला लागते त्यामुळे थोडा विचार केला आणि बोलायला सुरुवात केली . इथं मोठा प्रश्न होता तो म्हणजे करियरच बदलायचं होत त्यामुळे मी पण थोडासा दडपणाखाली होतो. 

पण त्यामुलीने पण उत्सुकता दाखवली मग आमची बरीच चर्चा झाली . आमचे एक जवळचे सर आहेत  जयंत जाधव  म्हणून . त्यानापण  फोन केला .  जयंत सरांचेपण खूपच आभार मानले पाहिजे आजपर्यंत कितीतरी विद्यार्थ्यासाठी मी त्याना फोन लावला आणि त्यांनीपण वेळ काढून विद्यार्थ्याना जमेल तसे मार्गदशन केल आहे त्यामुळे माझा फोन आला कि काय बोलायचं हे त्यांनाही अंदाज आहे .

त्यामुळ त्यांनीही थोड मार्गदर्शन केलं. मग तिचा कल पाहण्यासाठी परत जाधव सरांनी सांगितलेल्या यु ट्युबवरच्या विडीयो शेअर केल्या त्यावर त्या मुलीने पण अभ्यास केला . तिलापण अंदाज आला . मग तिच्या वडिलांनी तिला कोर्स लावला. तीन पण मनापासून अभ्यास केला. मी पण तीन चार वेळा फोन केला आणि विचारपूस केली तस तिला जास्त काही सांगण्याची गरज पडली नाही तीन चांगलच मनावर घेतलं होत. बघता बघता दिवस उलटून गेले आणि तिचा कोर्स संपला आणि तिच्यापेक्षा पण मला जास्त टेन्शन आलं. कारण सल्ला दिला होता आणि पोकळ सल्ला द्यायची मला पण सवय नाही त्यामुळे मीपण इकडं तिकड विचारपूस  करायला सुरुवात केली होती . 

ती मुलगी पण आत्मविश्वासाने इंटरव्यू देत गेली आणि शेवटी सरांचा फोन आला कि तिला चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये पूर्णकाळ ऑन लाईन जॉब मिळाला आहे आणि पॅकेज पण चांगल मिळालं आहे . हे ऐकल आणि जीव भांड्यात पडला ...           

मुलीच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा . 

   डॉल्फिन लॅबच्या आणखी एका शुभेच्छेला यश मिळाल.


Sunday, February 26, 2023

***** गतकाळाची होळी होवो , नवी पिढी उदयाला येवो *********

 

***** गतकाळाची होळी होवो , नवी पिढी उदयाला येवो *********

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥  -----कवी – वसंत बापट

 

करोना हि देशावर ओढवलेली मोठी आपत्ती होती पण हाच  करोना खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन यांच्यासाठी एक इष्टापत्ती ठरला . करोनापूर्वीच   या क्षेत्राला आधीच घरघर लागली होती पण करोनामुळे या क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली .  कमी होणारी विद्यार्थी  प्रवेशांची संख्या आणि नियमित द्यावे लागणारे शिक्षकांचे पगार यामुळे कित्येक शिक्षण संस्था या डबघाईला आलेल्या होत्या. कित्येकांना हा पगाराचा डोलारा सांभाळणे मुश्कील झाले होते  पण करोना आला आणि संस्थांचे नशीब पालटले.  अनियमित होणाऱ्या पगारामुळे आणि आय टी क्षेत्रात आलेल्या बुममुळे बरेच शिक्षक जॉब सोडून गेले . काही  ठिकाणी शिक्षकांना या संधीचा फायदा घेऊन काढून टाकले गेले . जे आहेत त्यांचा पगार निम्मा केला . इन्फ्रास्ट्रक्चर वापर खर्च शुन्य झाला . कन्झ्युमेबल  वरचा खर्च वाचला , असे अनेक खरच वाचले . विद्यार्थ्याकडून १०० टक्के फी वसुली झाली. ज्याठिकाणी शिक्षक पगारासाठी संप ,कुरकुर करत होते त्यानाही  निमुटपणे काम करण्याशिवाय पर्याय उरला नाही .

ऑन लाईन परीक्षेमुळे बऱ्याच वर्षापासून अडकून असलेल्या विद्यार्थ्यांची सुटका झाली .   दहावी , बारावी मध्ये मार्कांची खैरात केली गेली त्यामुळे तंत्रनिकेतन आणि महाविद्यालयांचे प्रवेश वाढले . यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनाच्या बेंडकुळीत बळ वाढले.

खर म्हणजे हि स्थिती जास्त काळ टिकणारी नाही आणि याचा पण अंदाज घेउन पुढे मार्गक्रमण करण्याच्या दिशेने कुणीही प्रयत्न करत नाही . प्रत्येकजण जल्लोषात मग्न आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा काय आहे हे विचारात घेउन त्यांना या क्षेत्राची गोडी कशी लागेल , त्यांच्यात कोशल्य कसे वाढेल याचा कुणीही विचार करत नाहीत . करोना काळात जो मिळालेला (वाचलेला ) पैसा आहे त्याचा योग्य विनिमय करून विद्यार्थ्यांचा पर्यायाने  महाविद्यालयाचा दर्जा कसा वाढवायचा याचा विचार कोणीही करताना दिसत नाहीत . उलट करोना काळात पैसे वाचण्याच्या ज्या क्लुप्त्या मिळाल्या त्याचाच वापर करताना बरेचजण दिसत आहेत .

मध्यंतरी म्हणजेच करोनापूर्व काळात ढकलगाडीतून आलेल्या विद्यार्थ्यामुळे बर्याच चुकीच्या प्रथा पडल्या होत्या त्या बंद करून आता आलेल्या विद्यार्थ्यांना एका नवीन साच्यात टाकायची हि एक अनमोल संधी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र गमावत आहे असे मला वाटते.  त्यांच्यामध्ये  अभियांत्रिकी शिक्षणाविषयी प्रेम वाढवण्याऐवजी फालतू अभिनेते , अभिनेत्री  यांच्या चित्रपटांचे प्रमोशनच्या कामाच्या सुपाऱ्या घेणही बऱ्याच ठिकाणी चालले आहे . दहा दहा दिवस गदरिंग आणि खेळाचे कार्यक्रम आयोजित करून आपण विद्यार्थ्यांचे पर्यायाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचे अफाट नुकसान करत आहे हे यांच्या गावीही नाही . कारण या कार्यक्रमापूर्वी किमान दहा दिवस आणि हे कार्यक्रम झाल्यावर किमान एक आठवडा अशाप्रकारे किमान विसतीस दिवस  विद्यार्थी हे वेगळ्याच मानसिकतेत वावरत असतात.

 ज्या  ठिकाणी तंत्रज्ञानाचे सोहाळे झाले पाहिजे , अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंतांचे विद्यार्थ्याना विचार मंथन आणि  मार्गदर्शन झाले पाहिजे त्या ठिकाणी टुकार कार्यक्रमाचा भडीमार सुरु झालेला आहे .  निरो म्हणे रोम जळत असताना फिडल वाजवत बसला होता तस या आगीच गांभीर्य ध्यानात न घेता आम्ही हातपाय शेकत बसलो आहे .

हि अडमिशनची परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही . बाहेरच्या जगात मंदीच वातावरण आहे . हि मंदी भारताच्या उंबरठ्यावर येउन ठेपली आहे . आपली लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे आपला देशच हा मोठ मार्केट आहे हे विचारात घेउन आता आपल्या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे . विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कौशल्यवान बनविल तर त्यांचा मार्ग तेच निवडतील हे सोप काम करण्याऐवजी आम्ही  सर्व शिक्षक वर्गाला कसली कसली कागदे गोळा करणे आणि रंगवणे यात अडकून टाकत आहे . रोज नवीन संकल्पनेच मढ , अभियांत्रिकी  शिक्षणक्षेत्राच्या पर्यायाने शिक्षकाच्या गळ्यात मारले जात आहे .

जर गायीला  दुध येत नसेल तर योग्य औषधोपचार करणे आणि तरीही फरक नाही पडला तर  शेवटी  गायीला बदलण्याऐवजी  धार काढणारा बदला , गोठा बदला , गोठा रंगवा , गोठ्यावर यंत्र लावा , गायीच्या गळ्यात ताईत बांधा आणि शेवटी धार काढणाऱ्याला बदला किंवा गाय खूपच दुध देते अस सर्टिफिकेट विकत घेउन मिरवा असला प्रकार जो चालला आहे तो बंद करण्याची खरी गरज आहे .

 

बऱ्याच ठिकाणी स्वायत्ततेच वार आलं अशावेळी वरून आलेल्या योजना , कार्यक्रम यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून ज्यांचा विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही अशाना गळ्यात मारून न घेता उलट त्यावर प्रश्न विचारले पाहिजे. संस्थापाकासाहित सर्वांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राच्यामुळे आपलं घर चालत आहे त्यामुळे आपल्या महाविद्यालयात चांगले प्रवेश झाले पाहिजेत आणि त्यासाठी कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याना कस कौशल्य पूर्ण बनवू असा स्वार्थी विचार केला पाहिजे . करोडो रुपये खर्च करून मोठमोठ्या प्रदर्शनीय प्रयोगशाळा बांधण्याऐवजी कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना कस कौशल्यपूर्ण बनवता येईल याचा विचार केला पाहिजे (नवीन लेखाचा विषय मिळाला लवकरच यावरही लिहीनच )

सध्या हि वेळ संक्रमनाची आहे . हे क्षेत्र स्थिती बदलत आहे  आणि हिच  वेळ आहे ती नवीन प्रथा पाडण्याची , अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राचा कायाकल्प करण्याची  ज्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला परत उर्जितावस्था येईल त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची  .

 

 

आपले विचार अवश्य मांडा

चित्तरंजन महाजन

९७६३७१४८६०

www.dearengineers.blogspot.com