Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग -1)

सध्या अभियांत्रिकी विद्यालयाची अवस्था खूपच गंभीर होत चालली आहे. अचानकपणे अभियांत्रिकी शिक्षणाला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामुळे आलेल्या सुगीत हात धुवून घेण्यासाठी वाढलेली महाविद्यालयांची संख्या, त्यामध्ये गुणवत्ता न राखल्याने आता मोठा प्रश्न बनून उभी ठाकली आहेत.
बाजारात मागणी नसल्याने झपाट्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कमी होणारा कल यामुळे आता अनेक महाविद्यालये बंद पडत आहे आणि बऱ्याच महाविद्यालयात आता पटसंख्या कमी करून घेतली जात आहे.
अभियांत्रिकी विद्यालय बंद पडणे अजूनही आपल्याकडे गांभीर्याने घेतला जात नाही कारण आपल्याकडे लोकांना अस वाटत की ह्यामुळे फक्त संस्थापक आणि त्याचे शिक्षक यांचेपूरताच हा प्रश्न आहे  त्याचा आपल्याला काय फरक पडणार आहे असं जनतेला वाटतं पण खरंच या प्रश्नांची व्याप्ती इतकीच आहे का?
हा प्रश्न फक्त वर उल्लेख केलेल्या बाबीपुरता मर्यादित नाही तर सर्वसामान्य लोकावरही त्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. एक अभियांत्रिकी विद्यालयांमुळे आसपासच्या किमान दहा गावातील अर्थव्यवस्था बदलत असते . अनेक छोटे मोठे उद्योग त्यावर अवलंबुन असतात , शेकडो लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे कामधंदा मिळतो . ही अभियांत्रिकी विद्यालये म्हणजे एक प्रकारची अर्थव्यवस्थेतील चक्र आहेत. आणि आता ह्या चाकांची गती कमी होत आहे आणि काही ठिकाणी तर ही चाकं बंद पडली आहेत. याचे दुष्परिणाम  आता बऱ्याच ठिकाणी दिसायला लागले आहेत.

सगळ्यात मोठा धोका तर अभियांत्रिकी शिक्षणावरून लोकांचा उडणारा विश्वास हा अतिशय घातक आहे. व्हाट्स अप आणि मोबाइल घुसून  फालतू विषयात गुंग झालेल्या बथ्थड डोक्याना या विषयावर बोलायला वेळच नाही किंबहुना हा विषय समजून घेण्याची कुवतही नाही.  पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या विषयाकडे कमी होणारा कल हा आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाला किमान 25 वर्ष मागे घेऊन जाणार आहे.

विद्यार्थी संख्या घटलेने संस्थापक पगार देऊ शकत नाहीत , त्यामुळे राज्यात  बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची आंदोलन होत आहेत,  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत . गावोगावी अभियंते पडून आहेत त्यांचं आणि त्यांच्या बुद्धी च व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न  आहे. बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या इमारतीच्या लाईटचे बिल भरण्याचीही कुवत संस्थापकाना राहिलेली नाही किंबहुना या अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चरच करायचं काय ह्याच कोडं पडलं आहे काही ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा विचार चालू केला आहे आणि काही ठिकाणी सुरू झाल्याची आहेत.

आता याप्रश्नामध्ये सरकारही हतबल झालं आहे कारण या प्रश्नांची व्याप्ती खूपच वाढली आहे आणि गेल्या काही वर्षात अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता वाढवण्याचे केलेले प्रयत्न हे केवळ आणि केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या वृत्तीमुळे वाया गेलेले आहेत.
आता करत असणारे उपाययोजना ह्या दूरगामी विचार न करता तात्पुरत्या उपचारासाठीचे आहेत त्यामुळे त्याचे फायदे न दिसता तोटेच दिसत आहे....खरं सांगायच तर आपल्याकडे कुठलीही योजना तयार करताना प्लॅन B हा तयार पाहिजे पण तो तयार केला जात नाही.
या प्रश्नाचा तिढा तसा खूपच मोठा आहे आणि तो सुटावा यासाठी काय करता येईल यासाठी डॉल्फिन लॅब्स प्रयत्नशील आहे. अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील बरीच मंडळींचा सहवास डॉल्फिन लॅब्समध्ये मिळत असतो .यावर चिंतन आणि विचारमंथन होत असत.बरेच प्रयोग होत असतात. यावरून बऱ्याच गोष्टी मनात येत असतात.अभियांत्रिकी शिक्षण हे वाचल पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे.प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात आणि आपल्याला त्या दोन्ही बाजूला पाहिले पाहिजे.
या विषयावर तुमचे विचार जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
धन्यवाद.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860


 

No comments:

Post a Comment