Tuesday, October 23, 2018

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा ( भाग 7)


*** अभियंत्रिकी सरणावर, देशाच भविष्य तिरडीवर ***

अभियांत्रिकी शिक्षण - दशा आणि दिशा या लेखमालेला मिळत असणाऱ्या  प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पूर्ण महाराष्ट्रतुन अनेक जणांचे फोन येत आहेत.बऱ्याच गोष्टी कळत आहेत , आणि महत्वाचं म्हणजे  रडगाणे गाणाऱ्यापेक्षा सद्यस्थिती आहे ती बदलण्यासाठी काम करायला खूपच जण तयार आहेत ही सगळ्यात महत्त्वाची आणि सकारात्मक गोष्ट आहे.
मित्रांनो, ही लेखमाला लिहिण्यामागे मला सरकारच्या धोरणावर,
संस्थापकावर, शिक्षकावर, विद्यार्थ्यांत्यांवर किंवा कुणावरही टीका करायची नाही पण ज्यागोष्टी चालल्या आहेत अर्थात या सर्वांना माहीतच आहेत पण यावर कुणी बोलत नाहीत मी फक्त मांडत आहे.
या सर्वमागे माझी फक्त एकच भूमिका आहे आणि ती म्हणजे राजा नागडा आहे हे सांगणाऱ्या माणसाची.
2000 पर्यत  अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रतिष्ठा आणि विद्वत्ता बऱ्यापैकी होती . अभियांत्रिकी शिक्षणाला दर्जा होता आणि सगळी काही आलवेल चाललं होतं.
पण नंतर बाजारात मागणी वाढली होती आणि ती पूर्ण करताना दूरदृष्टी वापरली नाही आणि काहीही विचार न करता अभियांत्रिकी महाविद्यालयाची संख्या वाढत गेली . तालुका पातळीवर अभियांत्रिकी महाविद्यालये चालू झाली अर्थात ही एक खूपच चांगली गोष्ट होती.खऱ्या अर्थाने ज्ञानाची गंगा समाजापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. पण याना परवानगी देताना तेथील शिक्षणाचा दर्जा चांगला कसा राहील आणि त्या दर्जात वाढ कशी होईल यांचेकडे दुर्लक्ष करण्यात आले.
बाजार अगदी जोमात आला होता आणि प्रत्येकजण धुंदीत होता . हवशे, गवशे आणि नवशे जोमात आले होते. अनेक स्तोम माजू लागली ,क्षणीक फ़ायद्यासाठी एखादी  गोष्ट करत असताना तिचा दुसऱ्या गोष्टी वर काय दूरगामी परिणाम होईल याचा कुणीही विचार करत नव्हते. आय टी क्षेत्रात आलेल्या तेजीत सगळेजण मस्त झाले होते. धडाधड नवीन नियम बनत होते. कसले कसले प्रशिक्षण सुरू झाली. कसले कार्यक्रम सुरू झाले . या प्रशिक्षणाचा आणि कार्यक्रमाचा अभियांत्रिकी शिक्षणात काय उपयोग हेच कळत नव्हतं प्रत्येकजण चला एक कागद फाईलला असाच विचार करत होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात  शिकवायचं असत हेच सर्वजण विसरून गेले होते. कागदपत्रे तयार करण्यात लोकांचा वेळ जाऊ लागला.
आपल्या देशाचा सगळ्यात वाटोळं झालं ते म्हणजे 1980 पासून आमच्यातील विद्वत्ता बाहेर जायला लागली होती . 2000 पासुन त्याला उत आला . प्रत्येक महाविद्यालयातील topper मुलं अगदी टिपून घेऊन गेले आम्ही आनंदात की आमची मुलं परदेशात गेली.
अरे पण गेल्या अठरा वर्षात ज्या पद्धतीने आमची चांगली मुलं नेली याची तुलना अल्लाउद्दीन खिलजीने भारत लुटण्यासाठी केलेल्या अठरा स्वाऱ्याशीच  होऊ शकते.त्यानं धनसंपत्ती नेली.आता आमची भावी ज्ञानसंपदा गेली.
जरा विचार करून बघा काय राहील आहे आमचेकडे? बुद्धीच नाही राहिली आहे. आणि जी काही उरली आहे ती येत्या काही वर्षात संपणार आहे. मधली फळीच गुणवत्तापूर्ण नाही आणि या फळीमध्ये जे काम करणारे आहेत त्यांना पुढं येऊन दिलं जात नाही आणि याचे प्रतिबिंब आजच्या शिक्षण व्यवस्थेतच नाही तर प्रत्येक क्षेत्रात दिसत आहे. पुढच्या फळीसाठी योग्य मार्गदर्शक नाहीत.
आता इथून पुढे खरी सत्व परीक्षा आहे. आता खरी गरज आहे जे काही लोक आहेत जे खरच प्रामाणिकपणे काम करतात त्यांनी एकत्र येण्याची. निसत्व होत चाललेल्या या शिक्षण क्षेत्राला अनुभव रुपी विरजण लावून  मंथनाची गरज आहे. पुर्णपणे सडण्यापूर्वी.....

तुमचे विचार ऎकायला निश्चित आवडेल.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे
9763714860

No comments:

Post a Comment