Sunday, December 23, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग 3२ )

*** पंख फुटलेले राजहंस,आणि.............. ***

काल एका सरांशी फोनवर बोलत होतो त्यांनी मला सांगितले कि ते एक कोर्स करायला लागले आहेत. म्हणाले कंटाळा आला या शिक्षकी पेशाचा आता इंडस्ट्रीमध्ये जाणार आहे. आश्चर्याचा धक्का बसला. मग आनंदही वाटला. कारण त्यांचेसारखे अभ्यासू आणि प्रात्यक्शिकामध्ये हुकुमत असणारे या पेशात टिकू शकणार नव्हते आणि टिकले असते तरी या शिक्षण क्षेत्राला त्यांची काहीच किंमत वाटणार नव्हती. त्यामुळे पुढे मागे डिप्रेशनमध्ये जाणेऐवजी हेच चांगले. खूपच आनंद वाटला. पण रात्री परत हा प्रसंग आठवुन मन सुन्न झालं.
गेल्या सहा महिन्यात बऱ्याच शिक्षकांनी शिक्षकी पेशाला स्वत:हून टाटा केला. त्यापैकी बरेचजण हुशार होते आणि महत्वाचे म्हणजे ते त्यांच्या विषयावर हुकुमत असणारे आणि काहीतरी वेगळ करून पाहणारे होते. खरंच अभियांत्रिकी शिक्षणाला मंदी आली ते एका परीन बरच झाल कारण आता खरी ओळख होत आहे माणसांच्या खर्या व्यक्तिमत्वाची. आतापर्यंत वाघांच कातड पांघरून वाघाचा आव आणनाऱ्याची आणि स्वत: वाघ आहे हि जाणीव जागी झालेवर डरकाळ्या फोडणाऱ्यांची. या मंदीन बऱ्याचजणांच अस्तित्व जागं झालं.
बाजाराला जेव्हा सुरुवात तेव्हा काही हुशार लोक चुकून आणि काही लोक काहीतरी आदर्श घेउन उद्योगक्षेत्र सोडून शिक्षकी पेशात आले. मनात त्यांचे खूपच स्वप्ने होती. पण या पेशात आलेवर इथल्या अतिहुशार माणसांनी पहिल्यांदा त्यांचा अंदाज घेतला. त्यांच्या बुद्धीचा फायदा स्वत:साठी करून कसा घेता येईल ते पाहिले . गोड बोलून त्यांचे डोक्यावर कागदी कामाचे भूत बसवले . यांना वाटत होते कि आपले कौतुक म्हणून आपल्यावर जबाबदारी देत आहेत. पण नंतर त्यांना जेव्हा समजू लागल कि आपला पोपट होत आहे तेव्हा मात्र त्यांची तगमग वाढू लागली. ज्यांना विरोध करायला जमल नाही त्यातील काहीजण डिप्रेशन मध्ये गेले तर ज्यांचेजवळ हिम्मत होती त्यांनी स्वत:च्या ज्ञानाच उपयोग करून स्वत: चे काहीतरी उद्योग करायला सुरुवात केली . 
याचवेळी आणखी एक गोष्ट घडली ज्यांची लायकी नाही आणि इतर कोणतही काम मिळाले नाही त्यांनी या पेशात प्रवेश केला आणि नशिबाने बाजारात मागणी असलेने त्यांना संधी पण मिळायला लागली. खरे हुशार होते ते. त्यांनी ओळखल कि आपल्याला नशिबाने संधी मिळाली आहे आणि याचेशिवाय पर्याय नाही. मग काय जी हुजुरीला सुरुवात झाली आणि आमचे शिक्षण क्षेत्र नासायला सूरुवात झाली. काम कमी पण हांजी हांजी करून यांनी वरिष्ठांच्या वर्तुळात प्रवेश केला. घाणेरडे राजकारण सुरु झाले . टोळ्या बनल्या प्रत्येक विभागामध्ये. प्रत्यक्ष काम करणे ऐवजी विभागप्रमुखाचे भोवती कोंडाळ वाढू लागलं. कामाच्याऐवजी मिटींगा वाढू लागल्या , पाळती सुरु झाल्या . कागदी घोडी नाचायला सुरुवात झाली . सगळेजण बिनकामाच्या कामात व्यस्त झाले .याचा फायदा घेउन त्यांनी विद्यार्थी केंद्रित काहीतरी करायच्या ऐवजी स्वकेंद्रित कामे करायला सुरुवात केली. गोड बोलून ,कामे टाळून स्वत:च्या पदव्या घेतल्या. आणि खरंच ज्यांना काही येत होत त्यांचे आधी व्यवस्थितपणे वरची पदे कमावली.आज आमच्या अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रामध्ये या लोकांचे प्रमाण वाढले आहे. फोटो फ्रेम करून ठेवायच्या यांच्या पदव्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला वाचवु शकत नाहीत. आज अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राला यांच्या पदव्यांचा भार सोसत नाही आणि हेच कारण आहे अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र कोसळायच . ज्यांना पंख आहेत ते उडून जात आहेत पण हे मात्र जाणार नाहीत. खरच खूप वाईट वाटत आहे भावी पीढीच.
पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

No comments:

Post a Comment