*** स्वायत्ततेची ऐशीतैशी ***
१९९९ ची गोष्ट आहे. माझा मित्र अक्षत केसरवाणी जो
अलाहाबादचा होता त्याचा मित्र आला होता. त्याच बी.टेक. झाल होतं आणि नोकरीच्या
शोधात तो इकडे आला होता. त्यान बी.टेक. म्हटल्यावर आश्चर्य वाटलं.
कारण बी.टेक. असुनही जॉब मिळत नाही म्हणजे
माझ्या दृष्टीने खूपच आश्चर्यची गोष्ट होती . कारण त्याकाळी महाराष्ट्रात सगळ्यात
जास्त मेरीट हे बी.टेक.साठी लागायचं. त्यावेळी बी.टेक. आणि बी. ई. मधील फरक नक्की
काय असतो ते माहिती नव्हत कारण ते जाणून घ्यायची आमची लायकी पण नसायची. पण बी.टेक.
म्हणजे लय भारी , जास्तच काहीतरी असं वाटायचं. मी याबाबत अक्षतला विचारलं तर तो
म्हणाला आमच्याकडे बी.टेक. फालतू समजतात आणि बी .ई.ला खूपच किंमत आहे. बी.टेक.
म्हणजे सगळे चिंधीचोर आहेत. त्यावेळी काहींही डोक्यात घुसलं नव्हतं आणि मी ते
विसरूनही गेलो होतो.
पण अलीकडे
महाराष्ट्रात पण बी.टेक.च जे पेव फुटायला सुरुवात झाली आहे ते पाहून मला त्याची आठवण झाली.
स्वायत्त महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना
बी.टेक. डिग्री दिली जाते हे सोपं आता कळल. स्वायत्तता म्हणजे अभ्यासक्रम
महाविद्यालय बनवणार. त्यांची प्रवेश प्रक्रिया वेगळी ,त्याची परीक्षा महाविद्यालय
ठरवणार, पेपर त्यांचे वेगळे आणि तेच तपासणार . म्हणजे बऱ्याच बाबतीत सारे निर्णय
हे महाविद्यालय स्वत: घेऊ शकणार. कितीतरी मोठी गोष्ट आहे हि. झपाटयान बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा
अभ्यासक्रमात समावेश करून त्यानुसार
विद्यार्थी घडवणार. खरंच खुप मोठी गोष्ट आहे. याबाबतीत आपल्याकडील स्वायत्त
संस्थांनी खूप मेहनत घेउन या स्वायत्ततेचा आब राखला होता . त्यामुळे चांगल्या
गुणवत्तेचे विद्यार्थी घडायचे . बी.टेक. म्हणजे हमखास चागली नोकरी हे ठरलेलं होत .
यामुळे आपल्याकडे बी.टेक. या पदवीला जास्तच महत्व प्राप्त झाल होत. स्वायत्त
संस्था हि कमी होत्या त्यामुळे बी.टेक. चा भाव हा खूपच होता .
मध्यंतरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मध्ये बाजारामध्ये
आलेल्या तेजीमुळे बरेच अभियांत्रिकी महाविद्यालये उभी राहिली. स्पर्धा सुरु झाली. पण
गुणवत्ता राखता न आल्याने बऱ्याच महाविद्यालयांना टाळा लावायची वेळ आलेली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणावरचा लोकांचा विश्वास उडू लागला. त्यामुळे बी.टेक. च्या आकर्षणाचा उपयोग करून घेण्यासाठी
काही महाविद्यालयांनी स्वायत्तता घेतली आहे . पण हि स्वायत्तता घेण्यापूर्वी
त्यांनी उत्तर प्रदेशातील स्वायत्त संस्थाचा अभ्यास करायला पाहिजे होता पण तो
केलेला दिसत नाही. स्वायत्तता म्हणजे मनमानी नाही तर ती एक जबाबदारी असते , खूपच मोठी जबाबदारी. हेच बऱ्याच स्वायत्तसंस्थेच्या लक्षात
आलेलं नाही. स्वायत्तता हि दुधारी तलवार आहे हे ते विसरलेले आहेत. ठोस असा निर्णय
घेऊन कार्यक्रम आखायच्या ऐवजी अजूनही काहीजण चाचपडत आहेत तर काहीजण प्रयोग करत
आहेत. पण या प्रयोगाच्या नादात ते विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहेत. हेच त्यांच्या
लक्षात येत नाही .स्वायत्ततेच्या नावावर मनमानी चालू आहे. अभ्यासक्रम स्वत: करायचा
तर तो सोपा करायचा. शिकवताना जेव्हड जमेल तितकंच शिकवायचं आणि जेव्हड शिकवलं आहे
त्यावरच पेपर काढायचा . झालं. पेपरही तिथंच तपासायचे मग काय विचारायला नको. निकाल
पाहिजे तसा लावायचा. त्यामुळे स्वायत्तसंस्थेत प्रवेश घ्यायचा म्हणजे कमी त्रासात चांगल्या
मार्काने पास व्हायची हमखास खात्री सध्या असा गैरसमज सगळीकडे पसरत चालला आहे . हे
वेळीच आवरलं नाहीतर हे खूपच घातक आहे. नाहीतर अजून काही वर्षात महाराष्ट्राची पण
अवस्था उत्तर प्रदेश सारखी व्हायची.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या
माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०
No comments:
Post a Comment